फडणवीसांवर टिका करणाऱ्या अतुल लोंढेंनी वार्डातून तरी निवडून यावे…

आधी लोंढेंनी (Atul Londhe) आपली पात्रता सिद्ध करावी आणि त्यानंतर मुख्यमंत्री राहिलेल्या आणि सध्या विधानसभेत विरोधी पक्षनेते असलेल्या फडणवीसांबद्दल बोलावे, असेही ॲड. धर्मपाल मेश्राम (Dharmapal Meshram) म्हणाले.
Dharmapal Meshram and Atul Londhe
Dharmapal Meshram and Atul LondheSarkarnama

नागपूर ः महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी काल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केली. फडणवीसांनी दक्षिण-पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील नागरिक आणि संपूर्ण विदर्भाची प्रतारणा केल्याचा आरोप त्यांनी केला. अतुल लोंढे यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीत एखाद्या वार्डातून तरी निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान देत भाजपचे प्रदेश प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम (Dharmapal Meshram) यांनी लोंढेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

वार्डाची निवडणूक लढून ती जिंकण्याचे आव्हान अतुल लोंढेंना (Atul Londhe) देत आहो. आधी त्यांनी आपली पात्रता सिद्ध करावी आणि त्यानंतर मुख्यमंत्री (Chief Minister) राहिलेल्या आणि सध्या विधानसभेत विरोधी पक्षनेते असलेल्या फडणवीसांबद्दल (Devendra Fadanvis) बोलावे, असेही ॲड. मेश्राम म्हणाले. अतुल लोंढेंनी केलेल्या आरोपांबाबत बोलताना ते म्हणाले, केवळ दक्षिण-पश्‍चिम नव्हे, विदर्भच नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम जनतेचा देवेंद्र फडणवीसांवर विश्‍वास आहे आणि तो विश्‍वास विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना ते सार्थ ठरवीत आहे. फडणवीसांच्या मतदारसंघाबाबत बिनबुडाचे आरोप करणाऱ्या अतुल लोंढेची फडणवीसांबद्दल बोलण्याची पात्रता नाही, असेही मेश्राम म्हणाले.

अतुल लोंढे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काल बोलताना म्हणाले की, विदर्भाचा अनुशेष, धानाचा प्रश्‍न आणि विदर्भाच्या कोणत्याही प्रश्‍नावर फडणवीस बोलत नाहीत. त्यांचा हा आरोप खोडून काढताना ॲड. मेश्राम म्हणाले की, अतुल लोंढे महाराष्ट्र कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते असल्यासारखे वाटत नाहीत. नेहमीच त्यांचे वक्तव्य बालिशपणाचे असते आणि मोठ्या नेत्यांवर टिका केली की, त्यांना समाधान मिळते की काय, असे आता वाटू लागले आहे.

Dharmapal Meshram and Atul Londhe
Video : काँग्रेसच्या अतुल लोंढे यांचे भाजपला आव्हान!

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात जे मुद्दे उचलले, जे निर्णय घेतले, त्यांपैकी एक तरी निर्णय महाविकास आघाडी सरकारने गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात घेतला का? विदर्भाच्या अनुशेष भरून काढण्यासाठी फडणवीस सरकारने मोठे काम केले. धानाचा बोनस त्यांनी एका झटक्यात दिला होता. पण महाविकास आघाडी सरकार अद्यापही धानाला बोनस देऊ शकले नाही. त्यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री, त्यांचे मंत्री, कॉंग्रेसचे मंत्री येवढेच काय तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भाच्या एकाही प्रश्‍नावर आवाज उचलला नसल्याचा आरोप ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com