Babanrao Taywade : स्वतंत्र ओबीसी पक्षाच्या निर्णयाबद्दल महासंघाचे अध्यक्ष म्हणाले...

OBC Community : प्रकाश शेंडगे यांची भूमिका कौतुकास्पद
Babanrao Taywade & Prakash Shendge
Babanrao Taywade & Prakash ShendgeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Politics : स्वतंत्र ओबीसी पक्षाच्या निर्णयाबद्दल प्रकाश शेंडगे यांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल त्यांचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने त्यांचे कौतुक केले आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. ओबीसी महासंघ हा राष्ट्रीय पातळीवरील संघ आहे. सर्वच राजकीय पक्षातील नेते, पदाधिकारी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सदस्य किंवा पदाधिकारी आहेत. त्यामुळे जोपर्यंत राष्ट्रीय कार्यकारणीशी चर्चा करणार नाही. तोपर्यंत याबाबत निर्णय घेता येणार नाही, असे डॉ. तायवाडे म्हणाले.

ओबीसी समाज 400 जातींचा समूह आहे. 60 टक्के ओबीसी समाज मागील 75 वर्षांपासून वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये काम करत आहे. त्यांचा विचार बदलून ओबीसींच्या विचारधारेतून त्यांना पक्षात आणावे लागेल. त्याला वेळ लागेल. त्यात किती यश मिळते हे पुढची परिस्थिती बघून लक्षात येईल, असेही ते म्हणाले.

Babanrao Taywade & Prakash Shendge
Maratha Reservation : भुजबळांची 'त्या' विधानाला कात्री; म्हणाले, विपर्यास केला...

नाभिक समाजाबद्दल अपमानजनक वागणूक दिली गेलेली नाही. छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून करताना अशा प्रकारे आंदोलनकर्त्यांकडून ओबीसी समाजातील लहान जातींवर दडपण आणले जात असेल तर अशा वागणुकीचा निषेध करतो. अशा प्रकारांचा संघटित होऊन प्रतिकार केला पाहिजे. यासाठी त्यांनी भुजबळ यांनी वक्तव्य केले. त्यात काही गैर नाही. त्यामळे माफी मागण्याचा प्रश्न नाही, असे तायवाडे म्हणाले.

देशातील ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी लगाले. यासोबतव 50 टक्क्यांची मर्यादा रद्द करावी लागेल किंवा शिथिल करावी लागेल. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या बैठकीत याबाबत ठराव घेतला आहे. त्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ त्यांचे अभिनंदन करते. इतर राजकीय पक्षांनी सुद्धा हे प्रमुख मुद्दे वचनपत्रात घेऊन आरक्षणाचा हा मुद्दा सोडविला पाहिजे. ओबीसी समाजाला न्याय द्यायला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपल्याला मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचा आश्चर्य वाटते. त्यांनी 27 तारखेला जल्लोष केला. मराठा समाजाबाबत मांडलेल्या मागण्या मान्य केल्याचे सांगितले. सर्व मराठा ओबीसी झाले आहेत असे सांगितले. जर मराठा समाजाला सर्व मिळाले तर मग आता पुन्हा आंदोलन कशासाठी करत आहात, असा सवालही तायवाडे यांनी केला. मागितलेले सर्व मिळाले तर मग आता आंदोलन कशासाठी? मागासलेपण सिद्ध करणारे सर्वेक्षण तत्काळ थांबावायला हवे. 17 तारखेला अध्यादेशाचे रूपांतर होऊन. अध्यादेश होणार असे दिशाभूल करणारे वक्तव्य केले जात आहे असल्याचे त्यांनी नमूद केले.

Edited By : Prasannaa Jakate

Babanrao Taywade & Prakash Shendge
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत शशिकांत शिंदेंनी केला सरकारवर 'हा' आरोप...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com