Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत शशिकांत शिंदेंनी केला सरकारवर 'हा' आरोप...

Shashikant Shinde accuses the government : अद्यादेशात नवीन काहीच नाही. मनोज जरांगे यांची सगेसोयरे यांना घ्या, ही मागणी.
Shashikant Shinde
Shashikant ShindeSarkarnama
Published on
Updated on

Satara NCP News : मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशात नवीन काहीच नाही. सरसकट आरक्षणाची मराठा समाजाची मागणी आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देता येते का, ओबीसीमध्ये बसविता येते का, हे सरकारकडून जाणीवपूर्वक जाहीर केले जात नाही. हे सरकार मराठा समाजाला झुलवत ठेवत आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदें यांनी केला.

आमदार शशिकांत शिंदे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी रमेश उबाळे उपस्थित होते. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या भूमिकेबाबत त्यांना विचारले असता आमदार शिंदे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत सरकार झुलवत ठेवत आहे. सध्या काढलेल्या अद्यादेशात नवीन काहीच नाही. मनोज जरांगे यांची सगेसोयरे यांना घ्या, ही मागणी होती.

Shashikant Shinde
Maratha Reservation : भुजबळांची 'त्या' विधानाला कात्री; म्हणाले, विपर्यास केला...

पण प्रत्यक्षात पितृसत्ताक असे केले आहे. पण, ते पूर्वीपासूनच होते. त्यासोबत मातृसत्ताक घ्यायला हवे होते. प्रत्येकवेळी राज्य सरकार आरक्षण देणार असे म्हणते पण, त्यातून खुलासा होत नाही. आरक्षण देताना कुठल्याही समाजाला धक्का न लागता आरक्षण देता येते का, किंवा ओबीसीमध्ये बसवता येते का, हे सरकारने जाहीर करावे. परंतू दुर्दैवाने तसे ते जाहीर करत नाहीत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामध्ये मुख्यमंत्र्यांची आणि त्यांच्या सरकारची काय खेळी, हे स्पष्ट होत नाही. जास्त दिवस लोकांना झुलवत ठेवून चालणार नाही. दोन्ही समाज दुखावले जाऊन त्यांच्यात तेढ निर्माण करण्याचे हे राजकारण करण्याचा हा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. या एक दीड वर्षात महाविकास आघाडी गेल्यानंतर महायुतीने काय करुन दाखवले. लोक फार समाधान आहे का? केंद्राने असे काय केले त्यामध्ये लोकांना समाधान आहे.

कालच बजेट झाले. त्यामध्ये शेतकऱ्यांबाबत निर्णय कुठे दिसतो का, युवकांबाबत निर्णय दिसतो का, गरीबांच्या बाबत निर्णय दिसतो का, इन्स्फ्रास्ट्रक्चर उभं राहिले म्हणजे विकास झाला असे होत नाही. विकास हा माणसाचा झाला पाहिजे. इमारतीचा आणि रस्त्याचा झालेला विकास झाला हे मान्य होत नाही. त्यातून श्रीमंत वर्गाचाच फायदा होतो. गरीबांचे प्रश्न तसेच आहेत. एखाद्यास मोफत धान्य दिले म्हणजे विकास झाला असे होत नाही.

एखादे घर दिले म्हणजे विकास झाला असे होत नाही. विकासाच्या बाबतीत दूरदृष्टीपणा असावा लागतो. भारताचा विकासदर आता पूर्ण पुढे जायला लागला आहे. असे जर असेल तर भारतातले लोक दुसऱ्या देशात का जायला लागले आहेत. याचा कुठेतरी विचार करायला पाहिजे, अशी टीका आमदार शिंदे यांनी मोदी सरकार व राज्य सरकारवर केली.

(Edited by Amol Sutar)

Shashikant Shinde
Pune: शिंदे, फडणवीस, अजितदादांमध्ये श्रेय वादाची लढाई; निधीअभावी रस्ता रखडला...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com