कंगनावर देशभरात गुन्हे दाखल, पण नागपूरकरांनी केली ‘ही’ अजब मागणी

कंगना राणावतच्या Kangna Ranaut विरोधात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पण कारवाई करण्याची अशी मागणी ही बहुधा पहिलीच असावी.
Kangna Ranaut
Kangna RanautSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : अभिनेत्री कंगना राणावत पागल झाली आहे. तिच्यावर उपचार करण्याची गरज आहे. नाही तर ती यापेक्षाही बेताल बोलत सुटेल. त्यामुळे कंगनावर नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार करावे, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे. तसे निवेदन संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मनोरुग्णालयाचे अधीक्षक पुरुषोत्तम मडावी यांना दिले आहे. कंगना राणावतच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पण कारवाई करण्याची अशी मागणी ही बहुधा पहिलीच असावी.

भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे भिकेत मिळाले असून खरे स्वातंत्र्य २०१४ साली मिळाले, असे बेताल वक्तव्य करणारी अभिनेत्री कंगना राणावत हिच्यावर मनोरुग्णालयात उपचार करण्यात यावे, या मागणीसाठी सामाजिक संघटना आग्रही झाल्या आहेत. वादग्रस्त विधाने करणाऱ्या कंगनाविरोधात विविध राजकीय पक्षांपासून तर स्वातंत्र्य संग्रामसैनिकांपर्यंत सर्वांनी विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, उपराजधानीत कंगनाच्या विरोधात चक्क प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करून तिच्यावर उपचार करण्यात यावा, अशी मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले आहे.

रस्त्यावर बरळणाऱ्या मनोरुग्णाला जसे पोलिस मनोरुग्णालयात दाखल करतात. त्याचप्रमाणे कंगनाला पोलिसांमार्फत नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णालयात दाखल करावे, तिला शॉक ट्रीटमेंट द्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ येणार म्हणून रुग्णालयात मोठी गर्दी जमली होती. विविध सामाजिक संघटनांचे पन्नासपेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित होते. सलीम खान यांनी मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांना या मागणीचे निवेदन दिले.

एका खासगी वृत्तवाहिनीवरील मुलाखती दरम्‍यान, अभिनेत्री कंगणा राणावत यांनी देश २०१४ मध्‍ये स्‍वतंत्र झाला असून १९४७ साली भीक मिळाली होती, असे वक्‍तव्‍य केले होते. या वादग्रस्‍त वक्‍तव्‍याचा देशभर निषेध होत असून ठिकठिकाणी राणावत यांच्‍याविरोधात देशद्रोहाचे गुन्‍हे नोंदविण्‍यात येत आहेत. कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून हे आव्हान दिले आहे. यात तिने 1947 मध्ये कोणते युद्ध झाले, असा सवालही केला आहे. तिने एका पुस्तकातील काही उतारेही दिले आहेत. तिने म्हटले आहे की, सगळीकडे स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे की, 1857 चा लढा हा स्वातंत्र्यलढा होता. याचबरोबर सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई आणि वीर सावरकरजी यांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. मला 1875 माहिती आहे पण 1947 मध्ये कोणते युद्ध झाले. कुणी मला याबद्दल ज्ञान दिल्यास मी माझा पद्मश्री परत करेन. याचबरोबर सर्वांचा माफी मागेन, असेही कंगनाने म्हटले आहे.

Kangna Ranaut
कंगना मूर्ख की देशद्रोही? भाजप खासदारानेच काढले वाभाडे

दुपारच्या वेळी अशाप्रकारचे निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एका पक्षाच्या अल्पसंख्याक विभागातर्फे निवेदन देण्यात आले आहे. निवेदन स्वीकारले.

-डॉ. पुरुषोत्तम मडावी, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, नागपूर.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com