Maratha Reservation : आधी दोन आठवड्यांचा अहवाल द्या, त्यानंतरच मुदतवाढ मागा

MLA Bacchu Kadu : राज्य सरकारला दिला घाई न करण्याचा सल्ला
MLA Bacchu Kadu on Maratha Reservation
MLA Bacchu Kadu on Maratha ReservationGoogle

Support to Manoj Jarange Patil from Amravati : मराठा आरक्षण हा विषय अत्यंत संवेदनशील आहे. महाराष्ट्र सरकानं यात घाई करून काहीच उपयोग नाही. गेल्या दोन आठवड्यांत सरकारनं आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणतं काम केलं, याचा अहवाल त्यांनी आधी मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाला सादर करावा. त्यानंतरच पुढं जावं, असा सल्ला प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते आमदार बच्चू कडू यांनी दिला. अमरावती येथे या विषयावर आमदार कडू यांनी रविवारी (ता. ५) आपली भूमिका स्पष्ट केली.

सरकारनं घाई केल्यापेक्षा आधी १५ दिवसांचा प्रगती अहवाल दाखवावा. आताच सरकार मनोज जरांगे पाटील यांच्याकडं तारीख वाढवून मागण्यासाठी जात आहे. अशी घाई केल्यानं काही फरक पडणार नाही, असे आमदार कडू यांनी सरकारला सुनावलं. (MLA Bacchu Kadu adviced State Government not to ask so early for time extension to Majon Jarange Patil on Maratha Reservation issue in Maharashtra)

मनोज जरांगे पाटील यांच्याशी सरकारचं शिष्टमंडळ सोमवारी (ता. ६) भेटणार आहे. सरकारकडून मराठा आरक्षणासाठी जरांगे यांनी दिलेली वेळमर्यादा वाढवून मिळावी, अशी अपेक्षा हे शिष्टमंडळ व्यक्त करणार आहे. त्यावर आमदार बच्चू कडू यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की १५ दिवसांचा प्रगती अहवाल पाहिल्यानंतर तर खरच जरांगे यांना पटलं की सरकार काहीतरी करतेय तर तेच मुदत वाढवून देतील. उद्या सरकारी शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट होणारच आहे. त्यामुळं सरकारनं आताच घाई करू नये, असा सल्लाही आमदार कडू यांनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आमदार बच्चू कडू यांनी काय करणार हे सरकारला आधीच स्पष्ट व परखडपणे सांगितलंय. सरकारसोबत मध्यस्थी करीत दोन महिन्यांचा वेळ मागण्यात आला आहे. या काळामध्ये जर सरकारने मराठ्यांसोबत दगाफटका केला, तर आपण मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहू व आंदोलनात सहभागी होऊन सरकारला घेरू, असा थेट इशाराच बच्चू कडू यांनी यापूर्वीच दिला आहे. बच्चू कडू यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आपला जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे, असं अनेकदा सांगितलंय.

जरांगे उपोषणावर असताना कडू यांनी त्यांना ‘एक घोट तरी पाण्याचा घ्यावा’, अशी विनंती केली होती. त्यावर जरांगे पाटील यांनी बच्चू कडूंचे आभार व्यक्त केले होते. जरांगे पाटील यांनी आभार मानताच बच्चू कडूंनी रक्त सांडून नव्हे, तर रक्तदान करून आम्ही मराठा आंदोलनाला पाठिंबा देऊ असं म्हटलं होते. बुलडाणा जिल्ह्यातील माँ जिजाऊंचं जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा येथं त्यांनी रक्तदानही केलं. त्यानंतर बच्चू कडू यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. सरकारसोबत तडजोड करण्यासाठी जरांगे यांच्यासोबत बोलणी केली. दुसऱ्या दिवशीच सरकारचं शिष्टमंडळ घेऊन बच्चू कडू थेट अंतरवाली सराटी येथं पोहोचले होते. तेव्हापासून बच्चू कडू हे मराठा आरक्षणासंदर्भातील घडामोडींवर लक्ष देत आहेत.

(Edited By : Prasannaa Jakate)

MLA Bacchu Kadu on Maratha Reservation
MLA Bacchu Kadu On BJP : पश्चाताप नाही; पण भाजपच्या दुटप्पी धोरणाचा निषेधच...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com