BJP vs Prahar : 'नौटंकी' कोण करीत आहे? बावनकुळे-बच्चू कडू यांच्यात जुंपली

BJP Minister Chandrashekhar Bawankule 'Nautanki' Remark Sparks Bachchu Kadu Angry Reaction in Amravati : अमरावतीमधील माजी आमदार बच्चू कडू आणि राज्याचे महसूलमंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री यांच्यात पुन्हा जुंपली आहे.
Bachchu Kadu 1
Bachchu Kadu 1Sarkarnama
Published on
Updated on

Chandrashekhar Bawankule Bacchu Kadu : माजी आमदार बच्चू कडू आणि राज्याचे महसूलमंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री यांच्यात पुन्हा जुंपली आहे.

कर्जमाफीसाठी पुकारलेल्या आंदोलनाला आंदोलनाला नौटंकी संबोधल्याने कडू हे राज्याचे महसूलमंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर चांगलेच संतापले आहेत. पालकमंत्री शेतकऱ्यांचा अपमान करीत आहेत. शेतकरी त्यांना त्यांच्या खिशातून कर्जमाफी मागत नसल्याचे सांगून कडू यांनी म्हटले आहे.

बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचा (Farmers) सातबारा कोरा करावा यासाठी आमरण उपोषण केले होते. महायुती सरकारने विधानसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. आता हीच वेळ कर्जमाफीसाठी योग्य असल्याचे कडू यांचे म्हणणे आहे. त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी एक समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर कडू यांनी उपोषण आंदोलन स्थगित केले होते.

पावसाळी अधिवेशनात समिती स्थापन करावी आणि कर्जमाफीची घोषणा करावी या मागणीसाठी बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी पुन्हा पदयात्रा काढली. त्यानंतर दांडी यात्रा काढली. कर्जमाफी संदर्भात कडू यांच्याशी सविस्तर बोलणी झाली आहे. याची सर्व माहिती असताना पुन्हा यात्रा काढणे, आंदोलन करणे ही नौटंकीच असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले होते.

Bachchu Kadu 1
Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्रातील अनेक नेते नुसते नौटंकी करतात; बावनकुळे यांचे विधान

याचा पुनरुच्चार बावनकुळे यांनी कडू यांच्या दांडी यात्रेला उद्देशून केला. त्यामुळे कडू चांगलेच संतापले. त्यांनी भावनिक अस्राचा वापर करणे सुरू केले आहे. बावनकुळे शेतकऱ्यांना नौटंकी म्हणत आहे ही दुर्दैवाची तेवढीच बाब आहे. कर्जबाजारी झालेला शेतकरी रोज आत्महत्या करीत आहे. त्यांना द्यायला सरकारकडे पैसे नाहीत.

Bachchu Kadu 1
Kishor Jorgewar controversy : भाजपच्या जोरगेवारांचा चौकासाठी 'अम्मा'नामा; शहीदाच्या मुलाच्या तक्रारीची मुख्यमंत्री दखल घेणार?

दुसरीकडे कर्ज घेऊन कोट्यवधींच्या घोषणा आणि प्रकल्प जाहीर केले जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. शेतकऱ्यांचा आंदोलनाला नौटंकी म्हणणे हा त्यांचा अपमान करण्यासारखेच आहे. सहा लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या विधवांच्या डोळ्यात पाणी आहे. त्या रस्त्यावर उतरल्या आहेत.

चंद्रशेखर बाबनकुळे मंत्री झाल्याने त्यांचे पोट भरले असावे. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचे दुःख कळत नाही. त्यांनी शेतकऱ्यांचा अपमान करणे बंद करावे. कारण त्यांना आम्ही कर्जमाफी मागत नाही. महायुती सरकारकडे कर्जमाफीची मागणी करीत आहोत. ती देण्याचे आश्वासन सरकारनेच दिले आहे. बावनकुळे यांचे मात्र वागणे आणि बोलणे स्वतःच्या खिशातून पैसे दिल्या सारखे असल्याची टीकाही बच्चू कडू यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com