Nana Patole News : नानांनी दिले टिळकांचे उदाहरण; म्हणाले, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी...

Nagpur : आम्ही लोकमान्य टिळकांचा विचार मानतो.
Nana Patole, Rahul Gandhi and Lokmanya Tilak
Nana Patole, Rahul Gandhi and Lokmanya TilakSarkarnama

Nana Patole on Rahul Gandhi's Thought : राहुल गांधींनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्या पक्षाचा विचार मांडला आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाचा विचार मांडला आहे. दोन्ही पक्षांची विचारसरणी वेगवेगळी आहे. तेव्हा विपरीत परिस्थितीमध्ये आम्ही महाराष्ट्रात एकत्र आलो होतो, असे नाना पटोले म्हणाले. (We follow the views of Lokmanya Tilak)

आज सकाळी नागपुरातील निवासस्थानी पटोले पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, गेल्या ७५ वर्षांमध्ये स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कॉंग्रेसने या देशाला उभं केलं आहे. सर्वधर्म समभावाचा संदेश घेऊन, सर्व धर्म जातींच्या लोकांना सोबत घेऊन कॉंग्रेसने हा देश मोठा केला आहे. भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांना माफी मागायला लावत आहे, ते चुकीचे आहे.

आम्ही लोकमान्य टिळकांचा विचार मानतो. त्यामुळे ‘मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफलं उचलणार नाही’, या लोकमान्य टिळकांच्या विचारावर राहुल गांधी चालत आहेत. मी चूक केली नाही. मी चोराला चोर म्हटलं, तर चुकलं कुठं, असं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे. निरव मोदी, ललित मोदी यांनी देशाचे कोट्यवधी रुपये लुटले आणि देश सोडून पळून गेले. त्यांना राहुल गांधींनी चोर म्हटलं आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागण्याचं कोणतंही कारण नाही, असं नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

किमान समान कार्यक्रमात सावरकर नव्हतेच..

एका विपरीत परिस्थितीत जेव्हा आम्ही तीन पक्ष एकत्र आलो. तेव्हा सावरकर हा विषयच नव्हता. तर सर्वधर्म समभावाचा पुरस्कर आम्ही करतो. कुठल्याही धर्माचा, जातीचा द्वेष करणार नाही, ही कॉंग्रेसची (Congress) भूमिका आहे. याच भूमिकेने कॉंग्रेसने हा देश मोठा केला आहे. सावरकरांबाबत राहुल गांधींनी (Rahul Gandhi) जेव्हा वक्तव्य केलं, तेव्हा इतिहासातील दस्तावेजांसह ते पत्रकारांसमोर मांडले होते. त्यामुळे या विषयावर आता जास्त काही बोलण्यात अर्थ नाही, असंही नाना पटोले म्हणाले.

Nana Patole, Rahul Gandhi and Lokmanya Tilak
Nana Patole : देवेंद्र माझे भाऊ; अमृता आमच्या लहान सूनबाई आहेत, त्यांच्याबद्दल कुणी बोललं तर...

प्र. के. अत्रेंचे विचार लक्षात घ्या..

प्र. के. अत्रे स्वातंत्र्यसेनानी आणि बुद्धिजीवी होते. त्यांच्याही विचारांकडे आपण लक्ष दिले पाहिजे. त्यांचे वाचन केले पाहिजे. त्यांचा विचार लक्षात घेतला तर आजची नेमकी परिस्थिती लक्षात येईल. कॉंग्रेसनं विचारांशी कधीही तडजोड केली नाही. सर्वधर्म समभावाचा पुरस्कार नेहमी कॉंग्रेसने केला आहे. शिवसेनेचा विचार वेगळा आहे, तो त्यांनी मांडला. याचा अर्थ महाविकास आघाडीत बिघाडी होईल, असे काहीही नाही, असंही नाना पटोले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com