

प्रज्ञा सातव यांच्या काँग्रेसमधून राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय वाद पेटला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिवंगत राजीव सातव यांचा संदर्भ देत वादग्रस्त वक्तव्य केले.
या घटनेनंतर काँग्रेस आणि भाजपमधील आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत.
Mumbai News : काहीच दिवसांपूर्वी काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी आपल्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. ज्यानंतर त्यांच्यावर काँग्रेसमधून जोरदार टीका झाली होती. त्यांच्या या निर्णयानंतर काँग्रेसला धक्का, पोकळी निर्माण झाली अशा आशयाच्या चर्चा राज्यभर सुरू झाल्या होत्या. ज्यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीच प्रज्ञा सातव यांचे काँग्रेसमधील योगदान काय? असा प्रश्न उपस्थित केला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी प्रज्ञा सातव यांच्या काँग्रेस सोडण्यासह भाजपमधील प्रवेशावर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी दिवंगत राजीव सातव यांची आठवण काढत हा प्रवेश ज्या दिवशी झाला त्याच दिवशी राजीवचा पुन्हा एकदा मृत्यू झाल्याचे म्हटलं आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना साम टिव्हीच्या ब्लॅक अॅण्ड व्हाईट या कार्यक्रमात आमदार प्रज्ञा सातवांचं काँग्रेस सोडून जाण्यामागचं कारण काय? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. आमदारकीचे अद्याप 5 वर्ष बाकी असतानाही आमदारकीचा राजीनामा देवून त्यांना भाजपमध्ये प्रवेश करावा असे का वाटले असा सवाल करण्यात आला होता. या प्रश्नावर सपकाळ यांनी उत्तर देताना भाजपला चांगलेच सुनावले आहे. त्यांनी प्रज्ञा सातव या गेल्या काय प्रश्ना पेक्षा भारतीय जनता पक्षाला अजून किती आमदार हवे आहेत हा प्रश्न आहे. त्यांच्याकडे पाशवी बहूमत आहे. त्यांच्याकडे थंम्पिंग बहुमत आहे. त्यामुळे एक आमदार न घेतला तर त्यांचे काय बिघडणार होते.
ज्याचे पती काँग्रेसचे कोर कार्यकर्ते होते. जे सालस स्वज्वळ नेतृत्व होतं. त्यांचे संबंध, निष्ठा ही गांधी परिवाराशी होती. अशा व्यक्तिला पक्ष सोडून पक्षात घेतला. आता त्यांना भाजप काय देणार? तर जी आमदारकी काँग्रेसने दिली त्याचाच राजीनामा द्यायला देवून पुढच्या अधिवेशनला ते तिच देतील. यात वेगळं असं भाजपनं काय केलं असाही सवाल आता सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.
प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी का दिली गेली याचे कारण सांगितले. ते म्हणाले की, काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या पत्नीला ही आमदारकी दिली गेली. राजीव सातव हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. ज्यांचे पक्षात मोठं योगदान होतं. ते काँग्रेसह महाराष्ट्राला पडलेलं एक सोनेरी स्वप्न होतं. पण ते अकाली गेले. त्यांच्या जाण्याने आजही काँग्रेसमध्ये हळहळ आहे.
त्याच हळहळीला फुंकर घालण्यासाठी, राजीव सातव यांच्या कार्याला श्रद्धांजली म्हणून काँग्रेसने त्यांना आमदारकी दिली. पण ही आमदारकी त्यांच्याकडून बघून दिलेली नाही. त्यांचे काम मोठं होतं म्हणूनही दिलेली नाही. ती आमचे कर्तव्य म्हणून त्यांना दिलेली होती. त्याकडेही भाजपने राजकीय हेतूने बघावं? जे दुर्दैवी असल्याची त्यांनी टीका केली आहे.
यावेळी त्यांनी प्रज्ञा सातव का गेल्या याचे उत्तर देताना, त्यांना कुठे डावललं, कुठे विसंवाद झाला असं काही नाही. जिल्ह्यात पक्ष वाढीसाठीही त्यांनी खूप प्रयत्न केले किंवा लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जीवाचे रान करून काँग्रेसासाठी काम केलं असेही नाही. उलट त्यांनी विरेधकांचे काम केलं असाच त्यांच्यावर आरोप होता. पक्षासाठीही त्यांचे योगदान मिळत नव्हते. तरिही त्याच्याबाबत कुठेही आम्ही तक्रार केली नाही.
उलट त्यांच्या वागणुकीमुळे पक्षातील अनेक जण दुरावले गेले, तरीही त्यांना पक्षाने कधी अंतर दिले नाही. याबद्दल जाब विचारला नाही. असे असताना त्यांनी काँग्रेस सोडली. त्या भाजपमध्ये गेल्या. आणि आता त्या सांगत आहेत. मी विकासासाठी, राजीव भाऊंचे स्वप्न साकार करण्यासाठी गेल्या. राजीव यांचे स्वप्न काय होतं आणि या कशासाठी गेल्या याची कारणे वेगळी आहेत.
मात्र त्या राजीव यांच्या पत्नी असल्याने ती सांगता येणारी नाहीत. पण त्या ज्या दिवशी गेल्या त्याच दिवशी राजीवचा पुन्हा एकदा मृत्यू झाला. हे दु:खदायक आहे. त्यांचे जाणे हे धक्कादायक नाही तर दु:खद आहे. अशातच भाजप कोणालाच सोडत नाही हे सत्य आहे. राजीव आणि त्यांच्या मातोश्रींना ज्या गोष्टींना छळलं त्या आजही राजीवच्या मृत्यू नंतर त्यांचा पिच्छा सोडवत नाहीत. याच गोष्टी अधिक वेदनादायी असल्याचेही प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.
1) प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस का सोडली?
→ अधिकृत कारण दिले नसले तरी राजकीय भवितव्याच्या दृष्टीने भाजपमध्ये प्रवेश केल्याचे मानले जाते.
2) हर्षवर्धन सपकाळ यांनी नेमके काय वक्तव्य केले?
→ प्रज्ञा सातव यांच्या प्रवेशाच्या दिवशी राजीव सातवांचा “पुन्हा मृत्यू झाला” असे वादग्रस्त विधान केले.
3) या वक्तव्यावर भाजपची प्रतिक्रिया काय?
→ भाजपकडून काँग्रेसवर भावनिक राजकारण केल्याचा आरोप केला जात आहे.
4) प्रज्ञा सातव यांची राजकीय भूमिका काय होती?
→ त्या विधान परिषदेच्या आमदार होत्या आणि काँग्रेसमध्ये सक्रिय होत्या.
5) या प्रकरणाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल?
→ काँग्रेसमधील अंतर्गत असंतोष वाढण्याची शक्यता असून भाजपला फायदा होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.