आंदोलनांबाबत दानवे म्हणाले, कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील अस्तित्व संपलेय, म्हणून...

आम्हाला रेल्वे गाड्या उपलब्ध करून द्याव्या लागत होत्या. त्याबद्दल मोदी (Narendra Modi) बोलत होते. त्याचा कुठलाही विपर्यास करण्याची आवश्‍यकता नाही, असे दानवे (Raosaheb Danve) म्हणाले.
Raosaheb Danve
Raosaheb DanveSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : कॉंग्रेसने महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या घरासमोर आंदोलने करण्याचा सपाटा लावलाय. कारण त्यांचे महाराष्ट्रातील (Maharashtra) अस्तित्व संपल्यात जमा आहे. आम्ही जिवंत आहोत, हे दाखवण्याच्या कॉंग्रेस (Congress) नेत्यांचा हा केवीलवाणा प्रयत्न आहे, असे म्हणत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कॉंग्रेसच्या आंदोलनांचा खरपूस समाचार घेतला.

आज प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांच्यासमवेत भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, विकास कुंभारे, महापौर दयाशंकर तिवारी, खासदार विकास महात्मे, माजी आमदार सुधाकर देशमुख, अनिल सोले, गिरीष व्यास आणि चंदन गोस्वामी व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महाराष्ट्रातील लोकांमुळे देशभर कोरोना पसरला असे म्हटलेच नाही. तर महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या नेत्यांमुळे कोरोना पसरला, असे म्हटले होते. कॉंग्रेसच्या नेत्यांनी मुंबई आणि दिल्लीतून हजारो लोकांना रेल्वे आणि रस्ते मार्गांनी इतर राज्यांमध्ये पाठवले. त्यामुळे मुंबई आणि दिल्लीतून कोरोना इतर राज्यांमध्ये पसरला. कॉंग्रेसचे नेते दररोज हजारोंच्या संख्येने लोकांना रेल्वे स्थानकांवर पाठवत होते. त्यामुळे आम्हाला रेल्वे गाड्या उपलब्ध करून द्याव्या लागत होत्या. त्याबद्दल मोदी बोलत होते. त्याचा कुठलाही विपर्यास करण्याची आवश्‍यकता नाही, असे दानवे (Faosaheb Danve) म्हणाले.

समृद्धी महामार्गानेच येणार बुलेट ट्रेन..

मुंबई बुलेट ट्रेनचे नियोजन जवळपास पूर्ण झालेले आहे. समृद्धी महामार्गानेच ही ट्रेन येणार आहे. त्यासाठी आता केवळ ३० टक्के जमीन अधिग्रहीत करावी लागणार आहे. उर्वरीत जमीन समृद्धी महामार्गाच्या कामाच्या वेळी घेतलेलीच कामी येणार आहे. त्यामुळे त्याच मार्गाने आता बुलेट ट्रेन येणार आहे, असे केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे आज येथे म्हणाले.

या महिन्याच्या अखेरीस किंवा फारच फार मार्च महिन्यामध्ये बुलेट ट्रेनचा विकास आराखडा तयार होणार आहे. केंद्र सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात पुढील २५ वर्षांचा वेध घेण्यात आला आहे. सर्वच क्षेत्रांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान नसते तर गरीबांना पक्क्या छताची घरे मिळाली नसती. जागतिक पातळीवर मोदींचे नेतृत्व मान्य केले केले आहे. विरोधकांनी अर्थसंकल्प न वाचताच प्रतिक्रिय देण्यासाठी तुटून पडले. कारण एक दिवस आधीच त्यांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे त्यांच्या टिकेकडे लक्ष देत नाही, असे रावसाहेब दानवे म्हणाले.

Raosaheb Danve
दानवे भडकले; म्हणाले आम्ही नाही, तर पाठीत खंजीर शिवसेनेनेच खुपसला…

रेल्वेमध्ये मिळणार शिजलेले अन्न..

रेल्वेमध्ये यापुढे डबाबंद अन्न दिले जाणार नाही, तर तेथे शिजविलेले अन्न प्रवाशांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठीचे नियोजन झालेले आहे. देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचे सरकारचे नियोजन आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये जमा केले जाणार आहेत. केंद्र सरकारने विदर्भालाही भरभरून दिलेले आहे. वर्धा नांदेड रेल्वे मार्गासाठी ३००० कोटी, वर्धा बल्लारशासाठी १८०० कोटी, वर्धा नागपूरसाठी ६०० कोटी आणि नागपूर नागभीडसाठी ११४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com