Sharad Pawar : शरद पवार म्हणाले, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली...!

समाजासाठी काम करणाऱ्यांच्या पाठीशी आपली शक्ती उभी केली पाहिजे. तरच समाजाचा चेहरा बदलेल आणि सन्मानाने जगता येईल, असे पवार (Sharad Pawar) म्हणाले.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

नागपूर : कविवर्य सुरेश भट यांनी कवितेत व्यक्त केलेल्या भावाप्रमाणे अन्याय, अत्याचार करणाऱ्या सर्व शक्तींविरुद्ध मशाली पेटवल्या पाहिजे. या मशाली पेटवण्यासाठी सर्वांनी एकसंघ राहिले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी केले. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, अशी कविता सुरेश भट यांनी केली होती. समाजासाठी काम करणाऱ्यांच्या पाठीशी आपली शक्ती उभी केली पाहिजे. तरच समाजाचा चेहरा बदलेल आणि सन्मानाने जगता येईल, असे पवार म्हणाले.

भटके विमुक्तांची अन्यायातून पूर्णत: मुक्ती करण्यासाठी शक्तिशाली संघटन उभारावे लागेल, नागपूर (Nagpur) येथील संमेलनात शरद पवारांनी एकसंघ राहण्याचा मंत्र दिला. भटके विमुक्तांवर होणाऱ्या अन्यायातून त्यांची पूर्णत: मुक्ती करायची असेल तर शक्तिशाली संघटन उभारून अखंड काम करावे लागेल, असे प्रतिपादन पवार यांनी येथे बोलताना केले. भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन नागपूरच्या रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाच्या समारोपीय सत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) बोलत होते.

यावेळी शरद पवार यांना ‘लोकशाही समाजवादाची राखण करणारा जाणता राजा’ हा किताब कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. भटक्या विमुक्तांचे प्रश्न सोडवायचे असतील तर एकसंघ झाल्याशिवाय पर्याय नाही. सांघिक आणि एकसंघ शक्तीच सन्मानाने जगण्याचा आधार देईल. त्यासाठी समाजाच्या सर्व संघटनांनी एकत्रित राहून संघटनेच्या पाठीशी शक्ती उभी केली पाहिजे असे पवार यांनी स्पष्ट केले.

भटक्या विमुक्तांना ब्रिटिश काळात गुन्हेगारी जमातीचा शिक्का मारून सोलापूर येथे तारेच्या कुंपणात ठेवत होते. १९५२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू सोलापूर येथे गेले असता त्यांनी तारेचे कुंपण काढून त्यांना मुक्त केले आणि गुन्हेगारी जमाती ऐवजी भटके विमुक्त संबोधले. मुक्तता तर झाली पण समाजावर होत असलेले अन्याय, अत्याचार, समाजाचे केले जात असलेले शोषण यातून पूर्णत: मुक्ती झाली, असे म्हणण्याची स्थिती नाही, याकडे पवारांनी लक्ष वेधले.

Sharad Pawar
Sharad Pawar : शरद पवार म्हणाले, मुस्लीम बांधवांच्या खांद्याला खांदा लावून काम करेन...

यातून मार्ग काढून पुढे जायचे असेल तर महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांनी सांगितलेल्या ज्ञान संपादन करण्याच्या मार्गाने जावे लागेल. म्हणून समाज शिक्षित झाला पाहिजे, यावर भर असला पाहिजे, असे पवार म्हणाले. राजर्षी शाहू महाराजांनी ज्ञानाचे भांडार सर्वसामान्यांनासाठी खुले केले. महात्मा फुले यांनी शिक्षणाचा मार्ग प्रशस्त केला. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे सूत्र अखंडपणे समाजासमोर मांडले. डॉ. पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचे हे सूत्र आणखी पुढे नेले, असेही पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com