मुंबई : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Assembly session) पुढच्या आठवड्यात मंगळवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशानचे जेवढे टेन्शन आता सरकारमधील मंत्र्यांना आले आहे. कारण या काळात विविध विभागाच्या सचिवांची विधानभवन प्रांगणात उपस्थिती सक्तीची केली आहे. इतकेच नाही तर ऐनवेळी सरकारला आवश्यक वाटणारी माहिती पुरवण्यास कुचराई किंवा दिरंगाई झाल्यास संबंधित विभागाचे सचिव कारणीभूत ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेशही मुख्य सचिवांच्या कार्यालयाने काढला आहे. त्यामुळेच अधिकाऱ्यांना टेन्शन आलयं.
अधिवेशनाच्या कामकाजात सत्ताधारी पक्षातील, विरोधी बाकावरील दोन्ही सदनातील आमदार जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करीत असतात. यावेळी त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर पीठासीन अधिकारी काही वेळेस ताबडतोब निर्देश देत असतात. तसेच लोकप्रतिनिधी प्रश्न उपस्थित करून त्याबद्दल कोणती कार्यवाही केली यावर प्रश्न विचारत असतात. त्यावेळी ताबडतोब माहिती सदनाच्या पटलावर अथवा संबंधित खात्याचे मंत्री, राज्यमंत्री यांना उपलब्ध करून द्यावी लागते.
मात्र बहुतांश वेळेला माहिती मिळत नसल्याने, ऐनवेळी उद्भवलेल्या अशा परिस्थितीमुळे मंत्री, राज्यमंत्री, नवख्या मंत्र्यांची यांची सदनात फजिती होते. अशावेळी प्रशासकीय अधिकारी वेळ मारून नेतात. माहिती पुरवण्याचे काम संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे असते. ही त्या विभागाच्या सचिवांची जबाबदारी असते, असे सांगण्यात आले.
रजेसाठी परवानगी घ्यावी लागणार?
अधिवेशन काळात सर्व अधिकाऱ्यांना रजा घेण्यासाठी अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, मंत्री कार्यालय अथवा मुख्य सचिव यांच्या परवानगीनेच रजा घेता येणार आहे. अन्यथा उपस्थिती सक्तीची आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.