
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी आपले वय किती आणि आपण बोलतो किती याचा त्यांनी स्वत: करण्याची गरज आहे. ते बोलले की बालिश बहू बडबडला ही म्हण आठवल्याशिवाय राहात नाही, या शब्दात बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या प्रवक्ते शितल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना आदित्य ठाकरे यांनी विचार करायला हवा. आपण काय बोलतो, कसे बोलतो आणि कुणाला आव्हान देतो याचा विचार केला पाहिजे, अशी भूमिका म्हात्रे यांनी मांडली. आदित्य वरळीचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. मात्र, गेल्या अडीच वर्षातील अनुभव लक्षात घेता वरळीकरांना आधीचे आमदार सुनील शिंदेच बरे होते, असे म्हणण्याची वेळ वरळीकरांवर आल्याची टीका म्हात्रे यांनी केली आहे.
गुंतवणुकीच्या विषयावरून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम आदित्य (Aaditya Thackeray ) यांच्याकडून सुरू आहे. चुकीच्या माहितीवर बोलण्यापेक्षा आदित्य यांनी आपल्या वरळी मतदारसंघाकडे लक्ष द्यावे, अशी टीका म्हात्रे यांनी केली. चुकीच्या पद्धतीचे आरोप करून संभ्रम निर्माण करणाऱ्या आदित्य यांना वरळीतील जनता पुढच्या निवडणुकीत उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असे म्हात्रे यांनी म्हटले आहे.
राज्यातील प्रकल्प गुजरातला नेले जात असल्याचा आरोप करीत विरोधकांनी गेल्या तीन दिवसांपासून राज्य सरकारला कोंडीत पकडले आहे. या विषयावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. पत्रकार परिषद घेत त्याला तितक्याच तत्परतेने उत्तर देत आदित्य ठाकरे यांनी आज सरकारवर जोरदार हल्ला केला. या पाश्र्वभूमीवर म्हात्रे यांनी आदित्य ठाकरे यांना ‘टार्गेट’ केल्याचे दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.