'ट्रॅफिकमुळे घटस्फोट' या अमृता फडणवीसांच्या विधानावर आदित्य ठाकरे म्हणाले...

मुंबई महापालिकेच्या (BMC) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापू लागले आहे.
Aditya Thackeray and Amruta Fadnavis
Aditya Thackeray and Amruta Fadnavis Sarkarnama

मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापू लागले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी आता महापालिकेला लक्ष्य केले आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट होतात, असे विधान त्यांनी केले होते. याला आता पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी उत्तर दिले आहे.

याबाबत विचारणा केली असता आदित्य ठाकरे यांनी अमृता फडणवीसांना टोमणा मारला. मला वाटते कॉमेडी आपण टीव्हीसाठी ठेवू. राजकीय मंडळी म्हणून आपण जे समाजकारण करत असतो, तेच करत राहू, असे ठाकरे म्हणाले. दरम्यान, या विधानावरून अमृता फडणवीसांवर टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी आता सर्व्हे मंकीच्या निष्कर्षाच्या आधारे विधान केल्याची सारवासारव केली आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही अमृता फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, मागील काही महिन्यांपासून 'ऐकावे ते नवल', अशा पद्धतीची वक्तव्ये करण्यात येत आहेत. भाजपच्या संबंधित लोकांमुळे होत असलेल्या वक्तव्यामुळे लोकांचे मनोरंजन होते. मात्र, आता लोक सुद्धा त्यांच्या अशा वक्तव्याला कंटाळले आहेत. मुंबईला बदनाम करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. मुंबईतील रस्ते गुळगुळीत आहेत, असा दावा आम्ही कधीही केला नाही. मात्र, रस्त्यांवरील खड्ड्यांबाबतची माहिती मिळताच ते खड्डे बुजवले जात आहेत. वाहतूक कोंडीमुळे लोकांचे घटस्फोट होत आहेत, हे विधान चुकीचे आहे.

Aditya Thackeray and Amruta Fadnavis
नितेश राणेंना कोल्हापूरला हलवणार; सीपीआर रुग्णालयात कार्यकर्त्यांची धावपळ सुरू

आगामी महापालिका निवडणुकीआधी सर्वच राजकीय पक्षांकडून एकमेकांवर जोरदार टीका सुरू आहे. यात आता अमृता फडणवीस यांनी उडी घेतली होती. त्या म्हणाल्या होत्या की, मी फडणवीसांची पत्नी म्हणून नव्हे तर सामान्य स्त्री म्हणून बोलत आहे. मी दररोज एखाद्या सामान्य नागरिकासारखी बाहेर पडते. वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा मलाही त्रास होतो. वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट होत आहेत कारण आपण कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ शकत नाही.

Aditya Thackeray and Amruta Fadnavis
मुलाची प्रकृती बिघडताच नारायणे राणेंची जिल्हा रुग्णालयात धाव; पण भेट होणार का?

मुंबईत अनेक प्रश्न आहेत. याचबरोबर मेट्रो आणि एसटी कर्मचाऱ्यांचाही मुद्दा आहे. याकडे सरकार लक्ष देत नाही. सरकारचे लक्ष खिसे भरण्यावर आहे. त्यामुळे सरकारवर टीकाही होणारच. मुंबईतील प्रश्नांवर सरकारने लक्ष द्यायला हवे, असेही अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या. अमृता फडणवीस यांच्या टीकेमुळे मुंबईतील आरोप-प्रत्यारोपांचे सत्र आणखी वाढले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com