दोन वर्षानंतर उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांची आठवण : खासदार कपिल पाटलांची टीका!

Kapil Patil : सरकार चालवताना त्यांना असं वाटत होतं की, मी घरून सरकार चालवू शकतो.
Kapil Patil
Kapil PatilSarkarnama

डोंबिवली : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज औरंगाबाद दौरा झाला. ठाकरेंच्या या दौऱ्यावर केंद्रीय मंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांनी निशाणा साधत साधला आहे. चला दोन वर्षांनंतर तरी हे शेतकऱ्यांसाठी तरी बाहेर पडले आहेत. सरकार चालवताना त्यांना असं वाटत होतं की, मी घरून सरकार चालवू शकतो. पण शेतकऱ्यांच्या भावना घरून समजून घेता येत नसतील, म्हणून आता ते औरंगाबादला चालले आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

कल्याण पश्चिम येथे खासदार कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने दिवाळी पहाट कार्यक्रम सोमवारी सकाळी होणार आहे. यासाठीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री पाटील हे कल्याण मध्ये आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Kapil Patil
Nitesh Rane : राणेंना त्यांच्या मंत्रालयाचा फुलफॉर्म येतो का ? ठाकरेंच्या प्रश्नाला राणेंचं प्रत्युत्तर

उद्धव ठाकरे हे औरंगाबाद दोऱ्यावर निघाले आहेत. याविषयी मंत्री पाटील यांना विचारले असता, त्यांना धन्यवाद करायला पाहिजे. दोन वर्षानंतर शेतकऱ्यांसाठी तरी बाहेर पडले. आता दिवाळीचा गोडवा आहे कशाला त्यांच्यामध्ये आपण कडूपणा आणायचा आणि काहीतरी आपण त्यांच्यावर भाष्य करायचं, असे ते बोलले. यानंतर हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, सरकार चालवताना त्यांना असं वाटल होत की मी घरून चालवू शकतो, पण शेतकऱ्यांच्या भावना घरात बसून समजल्या नसतील. त्या निमित्ताने तरी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा काम करतात, असाही टोला त्यांनी ठाकरे यांना लगावला.

सरकारच्या वतीने दिले जाणारे आनंदाची शिधाचे किट शहापूर येथे 100 रुपयांचे किट 300 रुपयाला विकले गेले आहे असा आरोप केला जात होता. यावर पाटील म्हणाले, शहापूरच्या ढाकळी गावामध्ये अशा प्रकारची घटना घडली असून ती सत्य आहे. मी डीएसओ ला तात्काळ सूचना दिल्या होत्या. डीएसओने त्याची चौकशी केली व त्यावर एफआयआर दाखल केली आहे, असे पाटील म्हणाले.

Kapil Patil
Raju Patil : महायुतीबाबत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी नेमकं काय म्हटलं ?

आदिवासी बांधवांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन, त्या रेशन दुकानदाराने 100 च्या ऐवजी 300 रुपये घेतले. परंतु त्याच्यावर निश्चितपणाने कारवाई होईल. त्यांना हेरिंग देऊन किंबहुना त्याच्या दुकानाचा परवाना देखील रद्द होईल. अशा प्रकारची कारवाई त्याच्यावर निश्चितपणाने होईल. मी आपल्या माध्यमातून आवाहन करीन की, अजून याचं वाटप सुरू आहे. रेशन दुकानदारांनी गरीब लोकांच्या भावनांशी खेळ करू नये.

ज्या हेतूने राज्य सरकारने हा निर्णय केलाय आणि आनंदाचा शिधा अशा प्रकारची भावना ठेवून लोकांपर्यंत शंभर रुपयांमध्ये ज्या चार वस्तू पोहोचवण्याची संकल्पना केलेली आहे, त्याला खऱ्या अर्थाने रेशन दुकानदारांनी सहाय्य करण्याची आवश्यकता आहे. म्हणून कुठेही अशा प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही याची खबरदारी घेऊन लोकांपर्यंत हे पोहोचवण्याचं काम कराव.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com