Ajit Pawar : जे दोषी त्यांच्यावर कडक कारवाई होणार; दगडफेकीवर अजित पवारांचा इशारा

Manoj Jarange Patil : आम्ही असा कोणता हत्येचा कट रचला की ३०७ सारखे गंभीर कलमे लावली
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यावेळी झालेल्या दगडफेकीत पोलिसही जखमी झाले होते. या दगडफेकप्रकरणी ऋषिकेश बदरे यांच्यासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यावर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ज्यांच्या चुका असतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा दिला दिला आहे.

अंतरवाली सराटी येथे आरक्षणासाठी मराठा आंदोलकांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. या आंदोलकांवर पोलिसांनी बेछूट लाठीचार्ज आणि गोळीबार केला होता. यात आंदोलक जखमी झाले होते. दरम्यान, आंदोलकांनीही पोलिसांवर जोरदार दगडफेक केली होती. यात अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. या दगडफेकप्रकरणी पोलिसांनी बदरेसह तिघांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून पिस्तूल, जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्यांना २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

Ajit Pawar
Devendra Fadnavis : ''टप्प्यात आल्यावर काय टिपायचं याचा आम्हाला...'' फडणवीसांचं सूचक विधान!

कार्यकर्त्यांचा कोणताही दोष नसतानाही सरकारने अटक केली. आंदोलन चिरडण्याचा सरकारचा हा डाव आहे. पोलिस अधिकारी तुषार दोशींच्या केवळ बदलीने काही होणार नाही, असेही ते म्हणाले. यावर बोलताना उपमुख्यमंत्री पवारांनी पोलिस प्रशासन कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. तपासातून सर्व बाहेर येईल, असेही म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवार म्हणाले, पोलिसांवर झालेल्या दगडफेकीचा तपास सुरू आहे. या तपासावेळी पोलिस यंत्रणा कुठल्याही प्रकारे येणाऱ्या दबावाला बळी पडणार नाही. त्यांनी केलेल्या तपासातून सर्व वस्तुस्थिती पुढे येईल. ज्यांच्या चुका असतील त्यांच्यावर कडक शासन केले जाईल, असा इशारा पवारांनी दिला.

दरम्यान, या अटकेचा जरांगे पाटलांनी निषेध केला आहे. ते म्हणाले, अंतरवालीतील कोणत्याही कार्यकर्त्याचा दोष नाही. उलट त्यांच्यावरच हल्ला झाला आहे. सरकारने सांगितलं होतं की, आम्ही हे गुन्हे मागे घेतोय. कुणालाही अटक केली जाणार नाही. आता अटक करणे म्हणजे हा सरकारचा कोणता डाव आहे ? आमच्यावर ३०७ सारखे गंभीर कलमे लावली आहेत. आम्ही असा कोणता हत्येचा कट रचला होता ? असा उद्विग्न सवालही जरांगेंनी उपस्थित केला.

(Edited by Sunil Dhumal)

Ajit Pawar
Nagpur Nana Patole : ‘वंचित’च्या सभेला राहुल गांधी नव्हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जाणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com