काँग्रेसला अजूनही भाजपची भीती; उमेदवारांना थेट मंदिर, चर्चमध्ये नेलं अन्...

मागील पाच वर्षात गोव्यात काँग्रेसच 17 पैकी 15 आमदार फुटले आहेत.
Congress
CongressSarkarnama

पणजी : गोव्यातील विधानसभा निवडणुकीचे (Goa Election 2022) वातावरण चांगलंच तापलं आहे. बहुतेक पक्षांनी उमेदवारांची घोषणा केली आहे. पण या रणधुमाळीत काँग्रेस (Congress) पक्षाला वेगळीच भीती सतावत आहे. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी सर्व उमेदवारांना शनिवारी मंदिर, दर्गा आणि चर्चमध्ये नेलं. निवडणूक जिंकल्यानंतर पक्ष सोडणार नाही, अशी शपथ यावेळी उमेदवारांना देण्यात आली. त्यामुळे गोव्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं नाही. (Goa Election Update)

गोव्यात मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक 17 उमेदवार विजयी झाले होते. पण वेगाने घडलेल्या राजकीय घडामोडींमध्ये भाजपने इतर पक्षांना साथीला घेत सत्ता मिळवली. त्यानंतर पाच वर्षांत काँग्रेसचे 17 पैकी 15 आमदार पक्ष सोडून भाजप (BJP) व इतर पक्षांमध्ये दाखल झाले. त्यामुळे काँग्रेस पुरती खिळखिळी झाली. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्यांकडून पुन्हा सत्ता मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. (Goa Congress Update)

Congress
भाजपला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्यांची पक्षाला रामराम करण्याची घोषणा

भुतकाळात घडलेल्या घडामोडींची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये, याची भीती काँग्रेसला अजूनही सतावत आहे. त्यामुळे पक्षाने 36 उमेदवारांना शनिवारी महालक्ष्मी मंदिर, बम्बोलिम क्रॉस आणि बेटिन मशिदीत नेत शपथ दिली. यावेळी गोवा काँग्रेसचे प्रभारी पी. चिदंबरमही (P. Chidambaram) त्यांच्यासोबत होते. याविषयी बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत म्हणाले, आम्ही जनतेच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. काही नेता म्हणत आहेत की, काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करून उपयोग नाही. ते दुसऱ्या पक्षामध्ये जातील. हे तेच नेते आहेत, जे आमच्या आमदारांना लुटत आहेत.

एखादा मुलगा आपल्या आई-वडिलांना सोडतो, त्याला दोघेही जबाबदार असतात. आमच्या आमदारांना त्यांच्याकडे घेणारे पक्षही तेवढेच जबाबदार आहेत. काँग्रेसच्या उमेदवारांना शपथ दिली, कारण काँग्रेसला मत म्हणजे भाजपला मत असा प्रचार केला जात आहे, असं कामत यांनी सांगितलं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आणि तृणमूलचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी अशी टीका केली होती.

काँग्रेसच्या उमेदवारांनी अशी घेतली शपथ

आम्ही काँग्रेसचे उमेदवार प्रतिज्ञा करतो की, निवडणुकीत निवडून आल्यानंतर पुढील पाच वर्ष आम्ही काँग्रेस सोबतच राहू. लोकांच्या भल्यासाठी काम करत राहू. विरोधी पक्षांनी कोणतीही ऑफर दिली तरी काँग्रेस सोडणार नाही, अशी शपथ सर्व 36 उमेदवारांनी घेतली. दरम्यान भाजपने यावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसलाच आपल्या उमेदवारांवर विश्वास नाही. मग गोव्यातील जनता त्यांच्यावर विश्वास कसा ठेवेल, असा टोला भाजपने लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com