Santosh Deshmukh Murder Case : दमानियांचा फडणवीस आणि अजितदादांवर गंभीर आरोप; आता जनतेलाच केलं आवाहन...

Anjali Damania News Dhananjay Munde Resignation CM Devendra Fadnavis : अंजली दमानिया या मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी करत आहेत.
Anjali Damania-Dhananjay Munde
Anjali Damania-Dhananjay Mundesarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने झाली आहेत. यापार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देशमुख कुटुंबियांना न्याय मिळणार नाही, अशी भीती व्यक्त केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरही त्या ठाम आहेत.

दमानिया यांनी रविवारी सोशल मीडियात एक पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सामान्य लोकांना (देशमुख कुटुंबाला) खरंच न्याय मिळेल का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यासाठी त्यांनी दोन घटनांचा उल्लेख केला आहे. 9 तारखेला काळ्या स्कॉर्पिओ गाडीतून २ मोबाईल मिळाले होते. त्यात एका बड्या नेत्याचा फ़ोन आला होता, अशी बातमी माध्यमांनी दाखवली होती.

Anjali Damania-Dhananjay Munde
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुखांच्या हत्येला दोन महिने, ठाकरेंच्या शिलेदाराने 'हे' पाच प्रश्न विचारून सरकारची केली कोंडी

मोबाईल डेटा रिट्रीव करण्यासाठी फॉरेंसिक मधे पाठवण्यात आला होता, आता 2 महिने झाले. कधी मिळणार तो डेटा? कधी कळणार, त्या नेत्यांचे नाव? आणि त्यांना वाचण्यासाठी कराड सुद्धा सुटणार, अशी भीती वाटत असल्याचे दमानियांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. दुसरं म्हणजे, 19 जुनला सातपुडा या शासकीय बंगल्यात आवदा कंपनी बरोबर 3 कोटीचा व्यवहार झाला असे धस म्हणाले होते, मग त्यात पुढे काय चौकशी झाली? काय स्टेटमेंट घेतली? अवादा च्या कर्मचाऱ्यांचे स्टेटमेंट घेतली का? मग धनंजय मुंडे यांच्यावर का गुन्हा झाला नाही?, असे सवालही त्यांनी केले आहेत.

संतोष देशमुख यांना जाऊन दोन महिने झाले. अनेक गोष्टी लपवल्या जात आहेत. त्या मोठ्या नेत्याच्या दबावामुळे चौकशी होत नाही असे मला वाटायला लागले आहे. अवादा कंपनी खंडणी प्रकरणात धनंजय मुंडेही सहभागी आहेत. म्हणून ही चौकशी नीट होणार नाही. त्यामुळे मुंडे आणि कराडांनाही काही होणार नाही. म्हणून हे मी लावून धरत आहे. त्यांची सर्व प्रकरणे मी बाहेर आणली, असेही दमानियांनी म्हटले आहे.  

Anjali Damania-Dhananjay Munde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची रणनीती होणार यशस्वी; अमित शाहांच्या भेटीनंतर महायुतीमधील कोंडी सुटणार?

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार त्यांची पाठराखण करत आहेत. त्यांना राजकारणातून बाहेर पडू द्यायचं नाही. आणि म्हणूनच त्यांचे मित्र म्हणून त्यांना ती कारवाई करायची नाही, असा आरोप दमानिया यांनी केला आहे. आता जनतेने हे लावून धरायला हवे. कुठल्याप्रकारे त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. त्याशिवाय न्याय होणार नाही, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.

एखाद्या सामान्य माणसाला कोणताही नेता चिरडू शकत नाही. महाराष्ट्रात पुन्हा संतोष देशमुख यांच्यावर झालेले निघृण कृत्य पुन्हा झाले नाही पाहिजे, यासाठी आपण लढूया, असे आवाहनही दमानिया यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com