Balasaheb Thorat : झिशान सिद्दीकी अजितदादांसोबत? थोरात म्हणाले, 'आम्हाला फायदाच होतो, नांदेडमध्ये काय झालं?'

Balasaheb Thorat reaction to Zeeshan Siddique talk of joining NCP : मुंबईत अजित पवार यांची जनसन्मान रॅलीत काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी स्वागताचे बॅनर लावले आहेत. याचबरोबर झिशान राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरातांनी टायमिंग साधत निशाणा साधला आहे.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : काँग्रेसपासून दुरावलेले आमदार झिशान सिद्दीकी यांची राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक वाढल्याचे समोर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार जनसन्मान रॅली घेऊन मुंबईत पोचले आहे. त्यांच्या स्वागताला झिशान सिद्दीकी यांनी बॅनरबाजी केली आहे.

यावर झिशान यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी यावर जोरदार टोलेबाजी केली. थोरातांनी साधलेल्या टायमिंगची देखील चर्चा होत आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले, "आम्हाला काही गोष्टी पूर्वीपासून माहीत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडला, तर त्याचा आम्हाला फायदाच होतो. तसा अनुभव आहे. लोकसभा निवडणुकीत तेच झाले. नांदेडचे बडे नेते भाजपमध्ये (BJP) गेले. मात्र सर्वसामान्य जनता आमच्यासोबत उभी राहिली. नांदेडची जागा आम्ही जिंकली". बाळासाहेब थोरातांनी अशोक चव्हाण यांचे नाव न घेता, झिशान सिद्दीकी यांना एकप्रकारे संकटाचा इशारा दिला.

Balasaheb Thorat
Zeeshan Siddique and Ajit Pawar : काँग्रेसपासून लांब... लांब... झिशान सिद्दीकींना अजितदादांचा गुलाबी रंग भावला अन् जनसन्मान रॅलीत उतरले

"काँग्रेस (Congress) पक्षावर लोकांचा विश्वास वाढू लागले आहे. लोकसभा निवडणुकीत त्याची प्रचिती आली. जनतेला काय हवं आहे हे काँग्रेसला चांगलं माहीत आहे आणि काँग्रेस जनतेच्या विश्वासावर नेहमीच खरी उतरली आहे. त्यामुळे कोणी सोडून जात असेल, तर त्या ठिकाणी आम्ही पुन्हा जोमाने उभं राहू. काँग्रेस एक विचार असल्याने पक्ष कोणी सोडून गेलं आहे, याचा विचार आम्हीत करत नाही", असे देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. बाळासाहेबांची ही प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचा विधानसभा निवडणुकीला समोरे जाण्याचा विश्वास सांगून गेली.

Balasaheb Thorat
Bhaskar Jadhav : आमदार जाधवांचा वेगळाच राजकीय मूड, पुत्रप्रेमाखातर घेणार मोठा निर्णय

सरकारी खर्चातून राजकीय प्रचार

महाराष्ट्राची विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली नाही. यावर बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला. "निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहेत. ही संस्था कोणाच्या प्रभावाखाली जाणं देशाच्या हितासाठी चांगलं नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते आता विधानसभेपर्यंत निवडणुका लांबणीवर जाणे म्हणजे, लोकशाहीला घातक असेच आहे. टी. एन. शेषन यांच्या काळात सत्ताधारी देखील घाबरायचे. मात्र आता सगळं उलट होत असून, निवडणुका पुढे ढकलून सरकारी खर्चातून राजकीय प्रचार सुरू आहे. सत्ताधाऱ्यांच्या या प्रकाराची महाराष्ट्र जनतेला माहिती नाही, असे नाही. सुज्ञ जनतेला हा प्रकार आवडलेला नाही आणि योग्य धडा शिकवेल", असा टोला देखील थोरातांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com