चित्रा वाघ म्हणतात, राऊतांचं गणित लहानपणापासूनच कच्चं...गिरे तो भी टांगे उपर!

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेला राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.
Chitra Wagh News
Chitra Wagh NewsSarkarnama

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला होता. नगरपंचायत निवडणुकीत (Nagar Panchayat Election) शिवसेना चौथ्या क्रमांकावर गेल्यानंतर फडणवीस यांनी टीका केली होती. त्यावर आम्ही चौथ्या क्रमांकावर गेलो असलो तरी सेनेने किती जागा लढवल्या हेही पाहायला हवे, असं प्रत्युत्तर राऊत यांनी दिले. आता राऊतांच्या या विधानानंतर भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी त्यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. (Chitra Wagh News)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी शिवसैनिकांशी संवाद साधताना भाजपसोबत (BJP) 25 वर्ष सडल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून सडकून टीका केली. फडणवीसांच्या टीकेला राऊत यांनी उत्तर दिलं. शिवसेनेचा (Shiv Sena) पहिले महापौर हेमचंद्र गुप्ते होते ते कधी महापैार कधी होते ? किती नगरसेवक निवडून आले होते ? या संदर्भातील एखादं अभ्यास शिबीर रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये आयोजित करायला पाहिजे, असा टोला राऊत यांनी लगावला होता. तसेच राऊत यांनी नगरपंचायती निवडणुकीत सेनेनं जागा जिंकल्या हे महत्वाचं असल्याचेही म्हटले होते. (Chitra Wagh Criticize Sanjay Raut)

Chitra Wagh News
भाजपच्या जन्माच्या आधी शिवसेनेचे वाघ निवडून आले ; राऊतांचा फडणवीसांना टोला

त्यावर चित्रा वाघ यांनी ट्विट करत राऊतांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. 'शिवसेना चौथ्या नंबरवर गेली हे महत्त्वाचं नाही तर सेनेनं जागा जिंकल्या हे महत्त्वाचं असल्याचं संजय जी राऊत म्हणताहेत. संजय राऊतांचं गणित लहानपणापासूनच कच्चं आहे की पराभवामुळे डोक्यावर परिणाम झालाय. गिरे तो भी टांगे उपर, अशी काहीशी अवस्था झालीय यांची,' असा टोला वाघ यांनी लगावला आहे.

ऱाऊतांनी फडणवीसांना दिलेले प्रत्युत्तर

महापालिकेच्या निवडणुका राजकीय पक्षाकडून लढवल्या जातात नाही, भाजप पहिल्या क्रमांकाचा विरोधी पक्ष आहे, ते कायम विरोधी पक्ष म्हणून राहो. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात काही बोलायलाच नव्हतं, मग एवढी मोठी पत्रकार परिषद घेऊन दखल का घेताय, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. 'भाजपच्या जन्माच्या आधी आमचे वाघ निवडून आले होते, फडणवीसांचा तेव्हा मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणाशी सबंध नव्हता. फडणवीसांच्या जन्माच्या आधीच्या या गोष्टी आहेत,'' असा खोचक टोला राऊतांनी यावेळी लगावला.

''अयोध्येच्या लढ्यातील शिवसेनेचं काम ऐतिहासिक आहे. रामजन्मभूमीचा थंड झालेला लढा तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्या ठिकाणी दोनवेळा जाऊन जागृत केला. त्यामुळे अयोध्येशी शिवसेनेचा काय संबंध आहे हे रामालाच माहिती आहे,'' असा टोला राऊतांनी भाजपला लगावला. राऊत म्हणाले, राम मंदिर आंदोलनात शिवेसेनेची भूमिका काय हे सर्वांना माहिती आहे. शिवसेनेने भाजप पक्षाच्या जन्मतारखेचा दाखला आणला तर उत्तर देणे सोप होईल. जनतापक्षाचे पतन झाल्यानंतर १९८० मध्ये भाजपची स्थापना झाली. शिवसेनेचा जन्म १९६९ मधील आहे. शिवसेनेचा पहिले महापौर हेमचंद्र गुप्ते होते ते कधी महापैार कधी होते ? किती नगरसेवक निवडून आले होते ? या संदर्भातील एखादं अभ्यास शिबीर रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये आयोजित करायला पाहिजे. कोणाला आस्वाद घ्यायचा असेल तर त्यांनाही येई द्या. वामनराव महाडिक पाहिले आमदार त्याच काळात निवडून आले , गिरगावात प्रमोद नवलकर, माजगावत छगन भुजबळ निवडून आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com