BJP Vs Jitendra Awhad : ठाण्यात आव्हाडांच्या घराबाहेर भाजप महिला मोर्चाचे आंदोलन!

BJP Mahila Morcha : आंदोलनकर्त्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
BJP Vs Jitendra Awad
BJP Vs Jitendra AwadSarkarnama

पंकज रोडेकर-

Thane News : प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते, या वादग्रस्त वक्तव्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाडांच्या ठाण्यातील निवास स्थानाबाहेर गुरुवारी भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यानंतर या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

तर 'ज्यांना हिंदू धर्माबद्दल आदर नाही त्यांना प्रभू रामचंद्रांनी सद्बुद्धी द्यावी,' अशी प्रतिक्रिया ठाण्यातील भाजप महिला मोर्चा माजी अध्यक्षा मृणाल पेंडसे यांनी दिली.

 राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतील विशेष अधिवेशनात बोलताना श्रीराम हे मांसाहारी असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. यावरून आता राजकीय वातावरण तापलं आहे. हिंदुत्वादी संघटनांसह भाजपसह शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) आव्हाडांविरोधात आक्रमक झाले आहेत.

आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अनेक राजकीय नेते, तसेच पंडित महंतांनीदेखील टीका केली. राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या युवक कार्यकर्त्यांनी बुधवारीदेखील आव्हाडांच्या निवासस्थानाजवळ जय श्रीरामच्या घोषणा देत, निषेध नोंदवला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

BJP Vs Jitendra Awad
Jitendra Awhad Vs Ajit Pawar : 'यांच्या बापाने आपल्या काकाला म्हणजेच...' ; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवार गटावर हल्लाबोल!

गुरुवारी सकाळपासून आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून ठाण्यात आंदोलनाला सुरुवात झाली. ठाण्यातील भाजप (BJP) महिला मोर्चा माजी अध्यक्षा मृणाल पेंडसे यांच्या नेतृत्वाखाली आव्हाडांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

आव्हाड नेमकं काय म्हणाले? -

'राम हा शाकाहारी नव्हता, तर मांसाहारी होता. १४ वर्षे वनवास भोगला होता, मग ते शाकाहारी कसे असू शकतात?' असे वक्तव्य करून आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी लक्ष वेधून घेतले आहे. 'आपण इतिहास वाचत नाही. राजकारणात वाहून जातो. राम हा आमचा, बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे. १४ वर्षे जंगलात असणारे राम शिकार करायचे,'  असं आव्हाडांनी म्हटलं आहे.

BJP Vs Jitendra Awad
Jitendra Awhad: आव्हाडांच्या वादग्रस्त विधानानंतर ठाण्यात राडा; अजित पवार गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

महंत सुधीरदास यांनी व्यक्त केला संताप -

महंत सुधीरदास म्हणाले, 'जितेंद्र आव्हाड यांचे हे विधान म्हणजे मूर्खपणाचे विधान आहे. वाल्मीकी रामायणापासून ते कुठल्याही 14 रामायणांमध्ये प्रभू श्रीराम मांसाहारी होते, याचा उल्लेख नाही. प्रभू श्रीराम हे फळ, कंदमुळं खाऊन ब्रह्मचर्य पत्करून वनवासात राहिले आहेत, असा उल्लेख सापडतो.'

तसेच 'अयोध्येत उभारत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पणामुळे भारतात राममय वातावरण झाले आहे. राक्षसांना जसा त्रास होतो, तसाच त्रास जितेंद्र आव्हाड यांना होत आहे. त्यांच्या या विधानाचा निषेध करतो.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com