सदावर्ते अन् ST कामगारांची हार; कामावर रुजू होण्यासाठी न्यायालयाचा अल्टिमेटम

ST Srike| Anil Parab| एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने आतापर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले
ST Srike| high court
ST Srike| high courtSarkarnama

मुंबई : एसटी संपाबाबत उच्च न्यायालयाने (High court) मोठा निर्णय दिला आहे. राज्य सरकारचा निर्णय धोरणात्मक असल्याचं निरीक्षण नोंदवत न्यायालयाने संपावर (ST Strike) असलेल्या कर्मचाऱ्यांना १५ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांनी आदेश मान्य न केल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी राज्य सरकारलाही मोकळीक दिली आहे. हा एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna sadavarte) यांनाही मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

तसेच एसटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढू नका. पुढील चार वर्ष राज्य सरकार एसटी महामंडळ चालवेल. त्यानंतर आर्थिक निकषाच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाईल, असंही न्यायालयाने म्हटले आहे. त्याच बरोबर गुरुवारी सकाळी १० वाजता या प्रकरणावर महत्त्वाची सुनावणी होणार असून न्यायलय सरकार आणि एसटी कामगारांची बाजू ऐकून घेणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता एसटी कर्मचारी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने आतापर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी सभागृहाला दिलेल्या माहितीनुसार, घरभाडे भत्त्यात 7 %, 14 % 21 % वरुन 8 %, 16 % आणि 24 टक्के वाढ करण्यात आली. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता 12 टक्क्यांवरून 28 % करण्यात आला.

कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सेवाकालावधीनुसार रुपये 2500, 4000 आणि 5000 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली. या वेतनवाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये सुमारे सात हजार ते नऊ हजारांपर्यंत वाढ झाली आहे. तर या वेतनवाढीमुळे महामंडळावर दरमहा रुपये 63 कोटीपेक्षा जास्तीचा भार पडणार आहे. ही पगारवाढ सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास असून कर्मचाऱ्यांना नोकरीची हमी आणि पगारही दर महिन्याच्या 10 तारखेच्या आत देण्याचा निर्णय राज्य सराकरने घेतला असल्याचे अनिल परब यांनी सांगितले.

राज्य सरकारने घेतलेला निर्णय कृती समिती संघटनेने मान्य केला. पण त्यानंतरही अनेक कर्मचारी संपावर ठाम होते. त्यानंतरही कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, कोणालाही कामावरुन काढून टाकले जाणार नाही. त्यांच्यावरील निलंबन, बडतर्फी, सेवासमाप्ती या सारख्या कारवाया मागे घेण्यात आल्या. 31 मार्च, 2022 पर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असे आवाहन अनेकदा राज्य सरकारच्या वतीने करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com