'' भाजपकडून लवकरच शिंदेंचा 'राजकीय' गेम''; राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा

Amol Mitkari on Chandrashekhar Bawankule Statement : एकनाथ शिंदे आणि शिंदे गट हा भाजपाला शरण गेला आहे..
Devendra Fadanvis and Eknath Shinde
Devendra Fadanvis and Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Amol Mitkari on Chandrashekhar Bawankule Statement : महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार शिंदे फडणवीस सरकार लवकरच कोसळणार असल्याची भाकितं केली जातात. यावरुन उलटसुलट प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या जातात. पण आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत' असं विधान केलं आहे. बावनकुळे यांच्या विधानांनंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या विधानावरुन राष्ट्रवादीचे नेते व आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. (Amol Mitkari on Chandrashekhar Bawankule Statement)

आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले, उद्या नागपुरात अधिवेशन असताना आणि भाजपा प्रदेशाध्यक्षांचं हे वक्तव्य याचा अर्थ स्पष्ट आहे भाजपला एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मान्य नाही आणि लवकरच त्यांच्यासह शिंदे गटाचा राजकीय गेम करून देवेद्र फडणवीसांना परत मुख्यमंत्रीपदी बसविण्यासाठी ते आसूसलेले आहेत.

Devendra Fadanvis and Eknath Shinde
Harshvardhan Jadhav : शिवाजी महाराजांची बदनामी रोखण्यासाठी शेत विकून स्वाभीमान यात्रा काढणार..

चंद्रशेखर बावनकुळें (Chandrashekhar Bawankule) च्या वक्तव्याचा अर्थ सोपा आहे. काही दिवसांपूर्वीच चंद्रकांत पाटील यांनी एक सभेत सांगितलं होतं की, देवेंद्र फडणवीस आमचे खरे मुख्यमंत्री आहेत. अशा पद्धतीचं त्यांचं एक वक्तव्यं होतं, आज बावनकुळेंचं वक्तव्य समोर आलं आहे. हे जाऊ द्या स्वत: एकनाथ शिंदेंचं काही दिवसांपूर्वी बोलले होते की महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस. याचा अर्थ स्पष्ट आहे , एकनाथ शिंदे आणि शिंदे गट हा भाजपाला शरण गेला आहे आणि भाजपाच्या मनात जे आहे की देवेंद्र फडणवीसांनीच नेतृत्व करावं, याचा अर्थ ते एकनाथ शिंदेंना कवडीचीही किंमत देत नाहीत. चंद्रशेखऱ बावनकुळेंचं वक्तव्याचा गांभीर्याने विचार शिंदे गटाने आणि महाराष्ट्राने केला पाहिजे.

Devendra Fadanvis and Eknath Shinde
या दहा मुद्यांमुळे विरोधकांचा मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार; अजित पवारांनी स्पष्ट सांगितले

बावनकुळे नेमकं काय म्हणाले होते?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे बोलत असताना मुख्यमंत्रिपदाबाबत सूटक वक्तव्य केलं होतं. जो जो समाज फडणवीस यांच्याकडे गेला, त्या समाजावरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. यामुळे मी भाजप प्रदेशाध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत. ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यांच्यामागे सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. फक्त मुख्यमंत्री पदावर बसवण्यासाठी नाहीतर महाराष्ट्राचं भवितव्य हे देवेंद्र फडणवीसच घडवू शकतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com