Abhishek Ghosalkar Shot Dead : 'महाराष्ट्राचा बिहार नव्हे बिहारच्याही पुढे', घोसाळकरांच्या हत्येनंतर सरकारला घेरले

Abhishek Ghosalkar Death : पोलिसांची दहशतच संपली आहे. पोलिस दलात होणाऱ्या हस्तक्षेपामुळे पोलिसांनाही मर्यादा येत आहेत. पोलिसांवर फक्त विरोधकांना संपवण्याची जबाबदारी आहे.
Abhishek Ghosalkar Death
Abhishek Ghosalkar DeathSarkarnama
Published on
Updated on

Thane Political News : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात राहुल गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर मुंबईतील दहिसरमध्ये ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची हत्या झाली.

या घटनांनंतर राज्यात कायदा सुव्यवस्था नसल्याचा घणाघात विरोधी पक्षाकडून करण्यात येतो आहे. 'महाराष्ट्राचा बिहार झाला नाही, तर महाराष्ट्र बिहारच्याही पुढे गेला आहे,' अशा शब्दांत 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारला सुनावले आहे. (Abhishek Ghosalkar Death News)

Abhishek Ghosalkar Death
Shivsena News : शिवसेनेत गटबाजी, तीन जिल्हाप्रमुखांचे दोन गट; उमेदवारीसाठी थोपटले दंड

जितेंद्र आव्हाड ((Jitendra Awhad) यांनी ट्विट करत महाराष्ट्राचा बिहार झाला, असे म्हणण्यात आता काहीच अर्थ उरला नाही. कारण महाराष्ट्राने बिहारला खूप मागे सोडलं आहे. गुंडांनी जणू काही महाराष्ट्र आपल्या मुठीत बंदिस्त करून टाकला आहे. त्यातच हतबल सरकार उघड्या डोळ्यांनी सारं काही पाहतंय, असे म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'पोलिसांची दहशतच संपली आहे. पोलिस (Police) दलात होणाऱ्या हस्तक्षेपामुळे पोलिसांनाही मर्यादा येत आहेत. पोलिसांवर फक्त विरोधकांना संपवण्याची जबाबदारी आहे; कायदा आणि सुव्यवस्था गेली खड्ड्यात!'असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. इतक्या घटना घडूनही सरकारला लाज कशी वाटत नाही. जनता हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघतेय; जनतेमधील रोष वाढतोय, पण लोकांचा जीव जाणे, याला सरकारच जबाबदार आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे, असा हल्ला आव्हाड यांनी ट्विटमधून सरकारवर केला आहे.

नाना पटोलेंकडून गृहमंत्री फडणवीस टार्गेट

'महाराष्ट्रात लागोपाठ उघडपणे गोळीबाराच्या घटना घडणं, ही अतिशय गंभीर बाब आहे. अभिषेक घोसाळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्याचा झालेला मृत्यू धक्कादायक आहे. ज्या पद्धतीने त्यांचा खून झाला तो भयानक प्रकार आहे.

राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का? हा प्रश्न मोठा होत चालला आहे. महाराष्ट्राची सर्व बाजूंनी होत असलेली अधोगती दुःखदायक आहे. ‘सागर’ बंगल्यावर बसलेल्या गृहमंत्र्यांचं महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष आहे की नाही, असा प्रश्न पडतो,' असे ट्विट करत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले.

(Edited By Roshan More)

R

Abhishek Ghosalkar Death
Abhishek Ghosalkar Death : 'कोल्ड ब्लडेड मर्डर' अगोदर हसत एकत्र बसून फेसबुक लाईव्ह अन् नंतर...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com