Eknath Shinde : दोन्ही मंत्र्यांचा बेळगाव दौरा 'या' कारणासाठी रद्द

karnataka Maharashtra Border Dispute : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी विधानानंतर शिंदे सरकारनं हा दौरा रद्द केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहेत.
Basavaraj Bommai
Basavaraj Bommaisarkarnama
Published on
Updated on

karnataka Maharashtra Border Dispute : कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नासाठी राज्यातील दोन मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोन्ही मंत्री 6 डिसेंबरला कर्नाटकातील बेळगावला भेट देणार होते. त्याआधीच कर्नाटकाचे मुख्यमंत्र्यांनी मोठं वक्तव्य केलं होत.

"महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना कर्नाटकात पाठवू नका," असा संदेश मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दोन दिवसापूर्वी दिला होता. हे दोन्ही मंत्री कर्नाटकात जाणार का, या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कारण यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक निर्णय घेतला आहे.

सीमावाद चिघळू नये, म्हणून शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांचा दौरा तूर्त रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. या विषयांवर सरकार भूमिका घेत नसल्याचा आरोप करुन विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोंडी केली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी विधानानंतर शिंदे सरकारनं हा दौरा रद्द केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहेत.

Basavaraj Bommai
Bhaskar Jadhav : मुंबई तोडण्याचं भाजपचं जुनं षडयंत्र ; भास्कर जाधव संतापले

सीमाप्रश्‍नी राज्य सरकारतर्फे नेमण्यात आलेले समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई 6 डिसेंबर रोजी बेळगाव दौर्‍यावर रवाना होणार होते. सध्या दोन्ही राज्यातील परिस्थिती लक्षात घेता शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी बेळगावला येऊ नये, अशी विनंती कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी एका संदेशाद्वारे महाराष्ट्राच्या मुख्य सचिवाला केली आहे.

Basavaraj Bommai
Rupali Chakankar : जुळ्या मुली लग्नप्रकरणी अहवाल सादर करण्याचा महिला आयोगाचा आदेश

बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी महाराष्ट्रातील भूभागांवर आता दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. जत तालुक्यातील 42 ग्रामपंचायतींनी काही वर्षापूर्वी केलेल्या ठरावाचा दाखला देत बोम्मई यांनी या गावांना कर्नाटक सामील करुन घेणार असल्याचे म्हटले आहे. या ठरावांचा कर्नाटक सरकार गांभीर्याने विचार करत आहे असं बोम्मई यांनी म्हटले आहे. मात्र राज्य सरकाराने महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची नेमणूक करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com