Sharad Pawar News : मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज, पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ! ''..तर मला जालन्याला जावं लागेल!

Jalna Maratha Protest : 'अशी' राज्याच्या गृहमंत्र्यांची सूचना असावी!
Sharad Pawar , Jalna Protest
Sharad Pawar , Jalna Protest Sarkarnama
Published on
Updated on

Jalna : जालन्यात गेल्या चार दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी सुरु असलेले आंदोंलन शुक्रवारी चिघळले. यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. यात अनेक आंदोलक आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यानंतर आंदोलनकर्ते आक्रमक झाल्यानंतर त्यांनी जाळपोळ केली. यानंतर आरोप - प्रत्यारोपांनी राजकारण ढवळून निघाले आहे. आता या पोलिसांच्या लाठीचार्जवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार(Sharad Pawar) यांनी शुक्रवारी (दि.१)माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जालन्यातील मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला. पवार म्हणाले, मला जालन्यातून एक दोन लोकांचे फोन आले आणि त्यांनी तिथं काय घडलं ते सांगितलं. मनोज जरांगे आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले होते. पोलिसांनी त्यांच्याशी विचारविनिमय केला. त्या चर्चेत सगळं शांततेत सुरू होतं. मात्र, चर्चेनंतर पोलीस(Police) बळाचा वापर करून त्यांना तिथून हुसकाऊन लावण्याचा प्रयत्न केला गेल्याचेही त्यांनी सांगितले.

'अशी' राज्याच्या गृहमंत्र्यांची सूचना असावी!

शरद पवार म्हणाले, खरं म्हणजे एकदा चर्चा केल्यानंतर पुन्हा लाठीहल्ला किंवा बळाचा वापर करण्याची काहीही आवश्यकता नव्हती. मात्र, हल्ली अशा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे कुठलेही प्रश्न असले आणि त्यांची उत्तर न मिळाल्याने रस्त्यावर आले तर बळाचा वापर करावा, अशी राज्याच्या गृहमंत्र्यांची सूचना असावी अशी टीकाही त्यांनी केली.(Latest Marathi News)

'' राज्याच्या गृहमंत्र्यांच्या मनात काही...''

पवार पुढे म्हणाले, “ राज्याच्या गृहमंत्र्यांच्या मनात काही घटकांबद्दलची जी भावना आहे ती पोलिसांच्या कृतीतून व्यक्त होत असते. हे चित्र जालन्यात दिसलं आहे. यात पोलिसांना काय दोष द्यायचा. पोलिसांना वरच्या पातळीवरून अशा सूचना आल्या आणि त्यांनी कामगिरी केली. यामुळे पोलीस आणि तरुणांमध्ये कारण नसताना कटुता वाढली. याची पूर्ण जबाबदारी राज्य सरकारला आणि गृहखात्याची जबाबदारी असणाऱ्यांची आहे.

...तर जालन्याला जाणार !

जालन्यातील घटनेत पोलिसांनी चर्चा केली आणि त्यानंतर लाठीहल्ला केला. हा अमानुष हल्ला आहे, असं स्थानिकांनी सांगितलं. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. हे थांबवलं नाही, तर मला त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांना धीर द्यावा लागेल.या लोकांची सुटका करण्यासाठी पावलं टाकावी लागतील असेही पवार म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com