एवढे दिवस का थांबला! भाजप-राष्ट्रवादी युतीच्या शेलारांच्या दाव्यावर अजितदादांनी सुनावलं

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये २०१७ मध्येच युतीसंदर्भात चर्चा झाली होती, असा गौप्यस्फोट भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.
Ajit pawar
Ajit pawarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्यामध्ये २०१७ मध्येच युतीसंदर्भात चर्चा झाली होती, असा गौप्यस्फोट भाजप (Bjp) नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे. त्यावरून राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चेला ऊत आला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शेलार यांना सुनावलं आहे. एवढे दिवस सांगायचे का थांबला, असा सवाल पवारांनी केला आहे.

पहाटेच्या शपथविधीच्याही दोन वर्ष आधी म्हणजे २०१७ मध्येच राष्ट्रवादीसोबत युतीसंदर्भात अंतिम बोलणी झाली होती, असे शेलार यांनी सांगितले. शेलार यावेळी म्हणाले, भाजपला २०१७ मध्येच राष्ट्रवादीसोबत युती करावी अस वाटू लागले होते. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, शेलार यांनी हे 2017 मध्येच सांगायचे होते. एवढे दिवस का थांबला. आता हे 2022 सुरू आहे. 2017 मध्ये बरेसचे नेते इकडे-तिकडे होते. त्यांची वक्तव्य आता काढायची का. 2010 मध्ये काय झालं, 2012 मध्ये काय झालं. यामध्ये कुणालाच रस नाही. आज आपल्यापुढे काय मुलभूत प्रश्न आहेत, यावर चर्चा व्हायला हवी, असं पवारांनी स्पष्ट केलं.

Ajit pawar
आपण महाराष्ट्रात राहतो! अजितदादांनी राज ठाकरेंना करून दिली आठवण

काय म्हणाले होते आशिष शेलार?

एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलताना शिवसेनेसोबतच्या (shivsena) तुटलेल्या युतीसंदर्भात शेलार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर शेलार यांनी हा गौप्यस्फोट केला. पहाटेच्या शपथविधीच्याही दोन वर्ष आधी म्हणजे २०१७ मध्येच राष्ट्रवादीसोबत युतीसंदर्भात अंतिम बोलणी झाली होती, असे शेलार यांनी सांगितले होते. शेलार यावेळी म्हणाले, भाजपला २०१७ मध्येच राष्ट्रवादीसोबत युती करावी अस वाटू लागले होते. कारण शिवसेनेचे रोज खिशात राजीनामे आणि तोंडात जहर अशी, त्रास देण्याची भूमिका असताना राज्यात राष्ट्रवादी आणि भाजप असे सरकार करावे, अशी चर्चा झाली होती. त्या चर्चेमध्ये पालकमंत्री देखील ठरले होते. त्यानंतर पुन्हा भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाने ठरवले की आपण तीन पक्षांचे सरकार स्थापन करु.

Ajit pawar
धुरळा उडू शकतो! पालिका, ग्रामपंचायत निवडणुकीच्या तारखा आयोगानं ठरवल्यात!

२०१७ मध्ये राष्ट्रवादीने युती करायला नकार दिल्याचे शेलार यावेळी म्हणाले. आम्ही तेव्हा म्हटले होते तीन पक्षांचे म्हणजे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे सरकार करु. त्यावेळी राष्ट्रवादीने याला नकार दिला. शिवसेनेशी आमचे जमूच शकत नाही, असे राष्ट्रवादीने सांगितले होते. राष्ट्रवादी, भाजपसोबत येत असताना भाजपने शिवसेनेला सोडले नाही. मात्र, २०१९ ला सत्ता दिसल्यावर शिवसेनेने भाजपला सोडायची भूमिका सहज घेतली, असेही शेलार म्हणाले होते.

शेलार यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. राष्ट्रवादीने ज्या शिवसेनेसोबत जमूच शकत नाही असे २०१७ मध्ये म्हटले होते, त्यांनी आता शिवसेनेशी अशी सलगी केली की जत्रेतले दोन भाऊ हरवले होते असे वाटावे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेची भूमिका किती महिन्यात किती वर्षात बदलते याची साक्षीदार भाजप आहे, असा टोला शेलार यांनी लगावला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com