Vishwanath Bhoir News : आगरी कोळी भवनाच्या भूमिपूजन सोहळ्याला आमदार भोईर यांचे नाराजीनाट्य?

Kapil Patil News : केंद्रीयमंत्री कपील पाटील यांनी जाहीर कार्यक्रमात दिला सल्ला, म्हणाले...
Vishwanath Bhoir
Vishwanath BhoirSarkarnama
Published on
Updated on

Kalyan-Dombivali News : आगरी कोळी भवनाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम इतक्या लवकर का घेता? असा सवाल कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी उपस्थित केला होता. मात्र या प्रश्नाला कोणतेही उत्तर न देता खासदार आणि केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांनी या कार्यक्रमाचे भूमिपूजन केले.

उलट भूमीपूजन सोहळ्याप्रकरणी बोलताना केंद्रीयमंत्री पाटील यांनी आमदार भोईर यांना चांगल्या कामासाठी सगळ्यांनी एकत्र यावे, असा सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे या भूमिपूजन कार्यक्रमावरून दोघांमध्येही एकमेकांबद्दल नाराजी असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांनी 7 कोटी 50 लाख रुपयांचा निधी या कामासाठी मंजूर केलेला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vishwanath Bhoir
Thane Mahapalika : मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यातील 200 कोटींची कामे करणाऱ्या कंपनीची होणार चौकशी; काय आहे कारण ?

यावेळी कार्यक्रमात स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर उपस्थित नसल्याने अनेक चर्चांना उधाण आले. तर मंत्री कपिल पाटील यांनी सांगितले की, ससा आणि कासवाची स्पर्धा सोडून पुढे जा . समाजासाठी चांगले काम करा. हे भवन सर्व समाजासाठी उभे राहत आहे. यासाठी सगळ्यांनी काम केले पाहिजे.

कुणबी समाजाच्या नोंदी होणार असतील तर थोडीशी अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सर्वांनी संयमाने घ्यावे मुख्यमंत्री तसेच सर्व मंत्रिमंडळाने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार असं स्पष्ट केलं आहे, असे केंद्रीयमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितलं.

तसेच, सरकारने योग्य भूमिका घेतली आहे, त्यामुळे कोणीही कुणाच्या भावना दुखावतील अशा प्रकारची वक्तव्य करू नये. सध्या वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत राहिलेलं उत्तम अशी प्रतिक्रिया केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे .

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे आणि अवघा महाराष्ट्र पिंजून काढणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता एक मोठी घोषणा केली आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

राज्य सरकारने 15 दिवसांत सगेसोयऱ्याच्या कायद्याबाबत अंमलबजावणी करावी, अन्यथा 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार असल्याचं जरांगे यांनी जाहीर केलं आहे. सरकारला दिलेली 15 दिवसांची मुदत 9 फेब्रुवारीला संपणार असल्याचंही त्यांनी लक्षात आणून दिलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Vishwanath Bhoir
Thane Mahapalika : मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यातील 200 कोटींची कामे करणाऱ्या कंपनीची होणार चौकशी; काय आहे कारण ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com