Loksabha Election Exit Poll : उत्तर- मध्य मुंबईत भाजपला उमेदवार बदलण्याचा फटका!, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आघाडीवर

Exit poll results Varsha Gaikwad Vs Ujjwal Nikam : भाजपला विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापून नवा चेहरा देणं भोवणार असल्याचं एक्झिट पोलनुसार दिसून येत आहे.
ujjwal nikam varsha gaikwad
ujjwal nikam varsha gaikwadsarkarnama

Mumbai North-Central Lok Sabha Constituency, : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा सातवा टप्पा शनिवारी पार पडला. आता सर्वांनाच 4 जून रोजीच्या निकालाची उत्सुकता आहे. तत्पुर्वी शेवटच्या टप्प्यातील मतदान संपताच विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल दर्शवण्यास सुरुवात केली आहे.

टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार, देशातील एकूण 543 जागांपैकी एनडीए आघाडीला 353-368, इंडिया आघाढी 118-133, इतर 43-48 जागा मिळणार असल्याचं दिसत आहे. तर महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैकी महायुतीला 22 आणि महाविकास आघाडीला 25 तर अपक्ष एका जागेवर दिसत आहे. यामध्ये भाजप - 18, शिवसेना -04, राष्ट्रवादी - 00, काँग्रेस - 05, ठाकरे गट - 14, पवार गट - 06 जागा दिसत आहे. यावरून भाजप महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उत्तर- मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वर्षा गायकवाड आघाडीवर दिसत असून, महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम पिछाडीवर दिसून येत आहेत. विशेष म्हणजे भाजपने या मतदारसंघातील सलग दोन टर्मच्या विद्यमान खासदार पूनम महाजन(Poonam Mahajan) यांना डावलून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे विरोधकांनी प्रमोद महजनांच्या वारशाला भाजपने डावलल्याचा टोलाही लगावला होता.

ujjwal nikam varsha gaikwad
Exit Poll Lok Sabha Election 2024 : माढ्यात मोहिते पाटील आघाडीवर; भाजपचे निंबाळकर पिछाडीवर

महाविकास आघाडीतील जागा वाटपात, मुंबई उत्तर-मध्य हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला होता. यामध्ये अखेर काँग्रेसने वर्षा गायकवाड(Varsha Gaikwad) यांची उमेदवारी जाहीर झाली होती.

ujjwal nikam varsha gaikwad
Amravati Lok Sabha Election 2024 Exit Poll: बच्चू कडू फॅक्टर फेल; अमरावतीत पुन्हा नवनीत राणाच? काय सांगतोय एक्झिट पोल...

काही दिवसांपूर्वी वर्षा गायकवाड यांच्या नाराजीबाबात चर्चा सुरू होत्या. मुंबई शहरातील लोकसभेच्या सहापैकी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या कमी जागांमुळे गायकवाड नाराज असल्याचं तेव्हा बोललं जात होतं. मात्र त्यानंतर आपण नाराज नाही आणि आपण नॉट रिचेबलही नव्हतो, असं स्पष्टीकरण गायकवाड यांनी दिले होतं.

मुंबईमध्ये आमच्या काँग्रेस पक्षाची अनेक ठिकाणी संघटनात्मक ताकद चांगली आहे. हा मुद्दा लक्षात घेऊन जागावाटप होणं गरजेचं होतं, असं वर्षा गायकवाडांनी तेव्हा म्हंटलं होतं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com