मुंबई : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय समीकरण बदलली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांनी एकत्र येत सरकारची स्थापना केली. दुसरीकडे शिवसेना (Shivsena) , राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) यांच्यातील महाविकास आघाडी अद्याप कायम आहे. त्यातच राज्यात काही नवीन समीकरणे तयार होणार का, याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
महाविकास आघाडी पोटनिवडणूक, महापालिका निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत कायम राहणार का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी युतीसंदर्भात विधान केले होते.
वंचित बाहुजन आघाडीच्या राज्य समितीच्या रेखा ठाकूर या अध्यक्षा आहेत. त्यांनी काही दिवसापूर्वी काँग्रेस व शिवसेनेसोबतच्या युतीसंदर्भात भूमिका घेतली होती. युती करायची असेल तर ती काँग्रेस व शिवसेनेसोबत करू, असा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांनी दिला होता.
यावरती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. युतीसाठी आम्ही तयार आहोत. मात्र, काँग्रेसचा विचार त्यांना मान्य असेल, तर आम्हाला कोणासोबतही युती करण्यास अडचण नसल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.
सेक्युलर मते एकत्र राहावीत. देश वाचवण्यासाठी सेक्युलर विचार घेऊन बरोबर येत असतील तर, त्यांना आमचा विरोध नाही, असेही पटोले म्हणाले. समोरासमोर येऊन चर्चा करत, पावले टाकली तर योग्य राहिल, असेही पटोले यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.