
Mumbai News : राज्यात महायुतीमध्ये सरकार स्थापनेवरून, मंत्रीपदावरून नाराजीनाट्य रंगले असतानाच, भाजपच्या बेलापूरमधील आमदार मंदा म्हात्रे यांनी मंत्रीपदावरून जोरदार टोलेबाजी केली आहे.
"मंत्र्यापेक्षा मला जास्त इज्जत आहे. मंत्री बनने म्हणजे काय दोन शिंग होतात का? पक्षाचा माझ्यावर विश्वास आहे. इथं काम करणाऱ्याला संधी आहे. मी काम करते. करत राहणार. असे असतानाच मी तिसऱ्यांदाच नकोशी का झाले?", असा सवाल देखील मंदा म्हात्रे यांनी केला.
भाजप (BJP) आमदार मंदा म्हात्रे या त्यांच्या बेधडक विधानांसाठी नेहमीच प्रकाशझोतात असतात. राज्यात महायुतीला अभुतपूर्व यश मिळाल्यानंतर सत्तास्थापनेवर, मुख्यमंत्री अन् मंत्रीपदाच्या वाटपावर खलबतं सुरू आहेत. भाजपमधील अनेकांना मंत्रीपदाची अपेक्षा अपेक्षा आहेत. काही पक्षश्रेष्ठींकडे 'फिल्डिंग' देखील लावली आहे. असे असेल, तरी काहींनी आपल्याल त्यात इंटरेस्ट नाही, असे म्हणून चाचपणी करत आहेत. यात नवी मुंबईच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी मंत्रीपदावरून केलेले बेधडक विधान चर्चेत आले आहे.
मंदा म्हात्रे म्हणाल्या, "मंत्र्यापेक्षा मला जास्त इज्जत असते, कामांचे नियोजन सुरू आहे. कामाच्या नियोजनाच्या यादा तयार केल्या आहेत. पालिकेत देखील जाणार आहे. मंत्री बनने म्हणजे काय दोन शिंग होतात का? मंत्रीपद मिळाल्यानंतर कार्यकर्ते म्हणतात, चांगल्या खाते आणा. चांगला बंगला घ्या, नागपूरला (Nagpur) यायचे आहे. हे सगळे मागत बसण्यापेक्षा चांगलं काम करा". मागणारे लोकं दुसऱ्या पक्षात गेले. तुतारी वाजवली, ती बंद पडली, असा टोला देखील विरोधकांना म्हात्रे यांनी लगावला.
आमदार मंदा म्हात्रे यांनी तिकीट कसे मिळाले, यावर देखील विधान करताना, विरोधक संदीप नाईक यांच्यावर नाव न घेता टोला लगावला. "मागणारे लोक दुसऱ्या पक्षात गेली. तिथं तुतारी वाजवली. ती बंद पडली. मी दहा दिवस घरी होती. देवधर्म करत होते. अमित शाह आले होते. मी काय मागितलं का? जो नही मागता उसकाही दखल लिया जाता है उधर. मागायचं नाही. दहा दिवस घरी होती. आली तिकीट. कुठल्या उद्योगपतीला फोन लावला का? अंबानी-अदानीला. कोठेही कोटी रुपये घेऊन नव्हतो. निवांत होतो. देवधर्म करत होतो. आली तिकीट. पक्षाला विश्वास आहे. इथं काम करणाऱ्याला संधी आहे", असे म्हात्रे यांनी म्हटले.
मंदा म्हात्रे भाजपच्या तिकिटांवर तिसऱ्यांदा आमदार झाल्या आहेत. त्यांना यावेळी पक्षातंर्गत विरोधकाला समोरे जावे लागले. भाजप नेते गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी पक्षाकडे तिकिटीसाठी मोठी फिल्डिंग लावली होती. परंतु मंदा म्हात्रे यांना पक्षाकडून संधी मिळाली. यानंतर संदीप नाईक यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षपद सोडत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात सामील होत, निवडणुकीच्या रिंगणात उतरले. बेलापूर मतदारसंघात चौरंगी लढत झाली. यात मंदा म्हात्रे विजयी झाल्या. यावर भाष्य करताना, लोक सहा-सात वेळा उभे होते. देवेंद्र फडणवीस सात वेळा उभे होते. मी तिसऱ्यांदाच का नकोशी झाली? असा सवाल मंदा म्हात्रे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.