हिवाळी अधिवेशनात मलिक टाकणार भाजप नेत्यांवर बॉम्ब

भाजप नेत्यांना तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही, असा इशारा मलिक यांनी दिला आहे.
Nawab Malik
Nawab Malik Sarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा भाजप (BJP) नेत्यांना सूचक इशारा दिला आहे. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Assembly Session) सात डिसेंबरपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन वादळी होणार असल्याचे मलिक यांनी सांगितले. ड्रग्ज प्रकरणामध्ये भाजप नेत्यांचाही थेट हात असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. तसेच येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये विस्फोटक माहिती सादर करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मलिक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर निशाणा साधला. तसेच त्यांनी भाजप नेत्यांनाही सूचक इशारा दिला आहे. ते म्हणाले, हिवाळी अधिवेशनात भाजपकडून माझ्यावर टीका केली जाईल. आरोप केले जातील. पण मीही त्यांना उत्तर देणार आहे. त्यासाठी माहिती गोळा करत आहे. माझ्याकडे काही नेत्यांविषयी विस्फोटक माहिती आहे. या माहितीनंतर काही भाजप नेत्यांना तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही, असं टीकास्त्र मलिक यांनी सोडलं.

Nawab Malik
घोळाची आरोग्य विभागाकडून कबुली; रविवारच्या परिक्षेवर प्रश्नचिन्ह

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी आणि भाजपच्या एका नेत्याची पार्टनशीप आहे. एका खासगी कंपनीत त्यांची पत्नी व गोसावी संचालक असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. या नेत्याचं नावही अधिवेशनात उघड करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ड्रग्ज प्रकरणाशी काही भाजप नेत्यांचा संबंध असल्याचा थेट आरोपही मलिक यांनी केला आहे.

क्रूझवर पार्टीचे आयोजन करणारा काशीफ खान याला अटक केल्यानंतर सर्वकाही बाहेर येईल. त्याचे व वानखेडे यांचे संबंध आहेत. फ्लेचर पटले फ्रॉड आहे. त्याचे संबंध समीर वानखेडे यांच्याशी 11-12 वर्षांपासून आहेत. पटेलसोबत आदीर उस्मानी हाही व्यक्ती आहे. तो आयात-निर्यातीचे काम करतो. उस्मानीही अनेक प्रकरणांमध्ये एनसीबीचा साक्षीदार आहे. त्याचीही वानखेडे यांच्याशी आधीपासूनच ओळख असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

Nawab Malik
आर्यनला अटक ते जामीन अन् बहीण सुहानाचे केवळ तीनच शब्द...

वानखेडे यांनी अटकेच्या भीतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने त्यांना अटक करण्यापूर्वी 72 तास आधी कळविण्याबाबत सांगितले आहे. एकप्रकारे त्यांनी मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला आहे. कारण आधी ते मुंबई पोलिसांकडे गेले होते. पण त्यांना तुरूंगात टाकल्याशिवाय आणि निर्दोष लोक तुरूंगातून बाहेर येईपर्यंत हा पिक्चर सुरूच राहीलल, असा सुचक इशाराही मलिक यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com