NCP Crisis Live News Updates अजितदादांचा शरद पवारांवर निशाणा ; "ही वेळ का आली.. प्रत्येकाचा काळ असतो..;

Todays NCP Meeting : "देशाला करिष्मा असलेले नेतृत्व लागतं,"
 NCP Crisis Live News Updates
NCP Crisis Live News Updates Sarkarnama
Published on
Updated on

NCP Splits : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राजकीय वातावरण ढवळून निघत आहेत. शरद पवार विरुद्ध अजित पवार हा सामना आता निर्णायक वळणावर आला आहे शरद पवार आणि अजित पवार यांनी आज आपल्या समर्थक आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. अजित पवार यांच्या बैठकीस सुरवात झाली आहे. या बैठकीत अजित पवार यांनी पवारांबाबत सूचक विधान केलं.

आपल्या बैठकीत अजित पवार यांनी शरद पवार आणि देशातील विविध पक्षाच्या कार्यकाळाचा आढावा घेतला. हे सांगत असताना अजित पवार यांनी ही वेळ का आली, याबाबत स्पष्टीकरण दिलं.

 NCP Crisis Live News Updates
NCP Meeting : 'आर. आर. पाटलांनी भाजपला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर अद्यापही बाकी आहे..' ; दहा वर्षांपूर्वीचा Video होतोय व्हायरल

"शरद पवार साहेबांच्या छत्रछायेखाली मी तयार झालो. आज मी जो काही तो पवार साहेबांमुळेच. १९७८ पासून पवारांना देशानं साथ दिली. प्रत्येकाचा काळ असतो," असे सांगत त्यांनी पवाराबाबत सूचक विधान केलं.

"देशाला करिष्मा असलेले नेतृत्व लागतं," असे सांगत अजितदादांनी देशात आलेल्या विविध पक्षाची सरकारबाबत सांगितले. "जयप्रकाश नारायण यांच्या जनता पक्षाला त्यावेळी निवडून दिले. तो पक्ष आता शोधावा लागतो," असे अजित पवार म्हणाले.

"सोनिया गांधी या परदेशी आहेत, म्हणून त्या पंतप्रधान होऊ शकत नाही," असे पवार साहेबांनी सांगितले, ते आम्ही ऐकले. त्यानंतर आम्ही राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली. आम्ही सक्रिय झालो.

१९९९ मध्ये सात जिल्ह्याचं खातं मिळालं," असे सांगत अजित पवार यांनी त्यांना मिळालेल्या जबाबदारी बाबत सांगितले.

"राज्यात1999 मध्ये राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार आले तेव्हा माझ्याकडे फक्त 7 जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली. तरीही मी काही तक्रार केली नाही. नंतर 2004ला राष्ट्रवादीचे 71 आमदार आले. काँग्रेसचे 69 आमदार आले. त्यावेळी सोनिया गांधींनी विलासराव देशमुखांना सांगितले होते की, राष्ट्रवादीच्या जागा अधिक असल्याने मुख्यमंत्री त्यांचा होईल. मात्र, 4 मंत्री अधिक घेऊन आलेली संधी राष्ट्रवादीने घालवली. ती संधी मिळवली असती तर आजपर्यंत राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री महाराष्ट्रात दिसला असता. त्यानंतर 2022 मध्ये आलेली मुख्यमंत्रीपदाची संधीही राष्ट्रवादीने घालवली," अशी खंत अजितदादांनी यावेळी व्यक्त केली.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com