ह्याचे डोके फिरले आहे! मुख्यमंत्री राव यांच्यावर आव्हाड संतापले

मुख्यमंत्र्यांनी संविधान नव्याने लिहिण्याची गरज असल्याचे वक्तव्य केलं आहे.
 Jitendra Awhad criticizes CM K Chandrashekar Rao
Jitendra Awhad criticizes CM K Chandrashekar RaoSarkarnama

मुंबई : संविधान (Constitition) बदलण्याची वक्तव्य अनेकदा काही नेत्यांकडून केली जातात. पण तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांनी यांनी थेट देशाचे संविधान नव्याने लिहिण्याची गरज असल्याचे विधान केले आहे. देशात नवा विचार, नवे संविधान आणण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले आहेत. त्यावरून देशभरात वाद निर्माण झाला आहे. (Jitendra Awhad criticizes CM K Chandrashekar Rao)

राव यांच्या या विधानावर भाजपसह (BJP) सर्व पक्षातील नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. राव यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ह्याचे डोके फिरलं आहे, असं ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे. राव यांनी केंद्रातील मोदी सरकारला (Modi Government) बंगालच्या उपसागरात फेकून देण्याची गरज असल्याचं विधान वादात सापडलं आहे.

 Jitendra Awhad criticizes CM K Chandrashekar Rao
अकरा उमेदवारांसाठी पवारांसह राष्ट्रवादीचे 24 दिग्गज नेते मैदानात

के. चंद्रशेअर राव यांची तेलंगणामध्ये सत्ता आहे. भाजपला ते सातत्याने जोरदार विरोध करतात. त्यातच त्यांच्या या वक्तव्याने मोठा वाद ओढवून घेतला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आपल्या संविधान नव्याने लिहावे लागेल. नवा विचार, नवे संविधान आणायला हवे. देशात बदल घडवण्याची गरज आहे. देशात क्रांतीची गरज आहे. आपण लढल्याशिवाय बदल घडणार नाही.

राव घेणार उध्वव ठाकरेंची भेट

केंद्र सरकारवर टीका करताना राव यांनी मोदी सरकारला बंगालच्या उपसागरात फेकून देण्याची भाषा केली आहे. ते म्हणाले, देशातील नेतृत्वामुध्ये गुणात्मक बदल होण्याची गरज आहे. केंद्रातील भाजपला हटवून बंगालच्या उपसागरात फेकायला हवे. देशासाठी जे करण्याची गरज आहे ते सर्वकाही आम्ही करू. आम्ही शांत बसणार नाही. ही लोकशाही आहे. आपल्या पंतप्रधानांना दुरदृष्टी नाही, अशा शब्दांत राव यांनी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. आपण पंतप्रधान बनण्यासाठी लढत नसून देशात बदल घडवण्यासाठी लढत राहणार असल्याचेही ते म्हणाले.

 Jitendra Awhad criticizes CM K Chandrashekar Rao
...पर हम झुकेंगे नहीं! राऊत संतापले अन् विरोधकांना दिला 'पुष्पा' स्टाईल डोस

याबाबत मी मुंबईला (Mumbai) जाऊन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार आहे. उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट घेणार असून त्यांच्याशी फोनवर चर्चा झाल्याचे राव यांनी सांगितले. देशातील सध्याच्या स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी निवृत्त आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अधिकाऱ्यांची हैदराबादमध्ये बैठक आयोजित केली जाणार आहे. भाजपशी लढण्यासाठी देशातील समविचारी नेत्यांना एकत्र करणार असल्याचे राव यांनी स्पष्ट केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com