Video Satyajeet Tambe : CM शिंदेंच्या महत्त्वाकांक्षी योजनेवरच सत्यजीत तांबेंची शंका; म्हणाले...

Vidhan Parishad MLA : सरकारने 'दान' देण्याची भाषा न करता शेतकऱ्यांच्या कष्टाला रास्त भावाची हमी द्यावी
Satyajeet Tambe
Satyajeet TambeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात अनेक लोककल्याणकारी योजनांचा पाऊस पाडण्यात आला. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेचाही समावेश आहे.

या योजनेतील कळीच्या मुद्द्यावर बोट ठेवत विधान परिषदेचे आमदार सत्यजीत तांबे यांनी सरकारला खडा सवाल केला आहे. ही योजना विधानसभा निवडणुकीनंतर गुंडाळण्याची शंकाही त्यांनी उपस्थित केली.

विधिमंडळात बोलताना सत्यजीत तांबे Satyajeet Tambe यांनी लाडकी बहीण योजनेतील काही त्रुटींवर बोट ठेवले. ते म्हणाले राज्यातील महिलांच्या सबलीकरणासाठी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' सुरू झाली ही आनंदाची बाब आहे. या योजनेबाबत सरकारचे शाश्वत धोरण असले पाहिजे. केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून योजनेची अंमलबजावणी करू नये, अशी अपेक्षा व्यक्त करताना तांबेंनी या योजनेसाठी तरतूद केलेल्या निधीकडे लक्ष वेधले.

राज्यात लाडकी बहीण योजनेच्या Ladki Bahin Yojana अंमलबजावणीसाठी 46 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. असे असताना शासनाने केवळ 10 हजार कोटींची तरतूद केले आहे. त्यामुळे योजनेच्या भविष्याबाबत विरोधकांसह नागरिकांच्याही मनात शंका आहे. या शंकेचे निरसन शासनाने करावे, असे अवाहनही तांबेंनी केले.

Satyajeet Tambe
Vijay Wadettiwar : राज्यात सत्ता बदलाचं वारं, सत्तेतील अनेकजण विधानपरिषदेत वेगळा निर्णय घेतील; वडेट्टीवारांचा रोख कुणाकडं?

राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवरही तांबेंनी सरकारचे लक्ष वेधले. अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात ठिकठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शासन दुधाला अनुदान देण्याचे आश्वासन देत आहे. शासनाने दुधाला हमीभाव द्यावा, अशा शेतकऱ्यांच्या भावना आहे. त्यामुळे सरकारने 'दान' देण्याची भाषा न करता शेतकऱ्यांच्या कष्टाला रास्त भावाची हमी द्यावी, असा अग्रह तांबेंनी केला.

सरकारने मागील अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा विकास दर 10 टक्के दाखवलेला आहे. या अर्थसंकल्पात मात्र हा विकास दर 5.5 टक्के का आहे, असा खडा सवाल तांबेंनी केला. नमो सन्मान योजनेत महाराष्ट्रातील 92 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला असला तरी 33 लाख शेतकरी हे या योजनेपासून वंचित आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

शेतीच्या विकासाच्या दराच्या बाबतीत महाराष्ट्रात अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे. हरियाणात 78 टक्के जमीन सिंचनाखाली असताना महाराष्ट्रात हे प्रमाण केवळ 16 टक्के आहे, अशी खंतही ताबेंनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com