राष्ट्रवादीमुळेच शिवसेनेचा ऱ्हास ; आढळराव पाटलांचा गंभीर आरोप

"खेड तालुक्यातील झालेल्या बंडखोरीची दखल घेतली गेली नाही," असे सांगत आढळरावांनी शिवसेनेवरच निशाणा साधला.
Shivajirao Adhalrao Patil
Shivajirao Adhalrao Patilsarkarnama

पुणे : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या (shivsena) समर्थनार्थ शिरुर लोकसभा मतदार संघात चाकण येथे शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा रविवारी घेण्यात आला. त्यावेळी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil), आमदार सचिन आहिर, माजी आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेनेच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं.

शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, "राज्यात राष्ट्रवादी कॉग्रेसचा सर्वात जास्त फटका शिवसेनेला बसल्याचा गंभीर आरोप माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी केला आहे. राज्यात 150 ते 200 जीआर काढले आहेत. पुणे जिल्ह्याच्या DPDC चा 170 कोटीचा निधी एकतर्फी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या खासदार आणि आमदारांना वाटपही केला आहे,"

शिवसेनेत दीड वर्षापुर्वी खेड तालुक्यात बंडखोरी झाल्याची आठवण माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी यावेळी करुन दिली. "दुदैवाने बंडखोरी करणा-या गद्दारांचा निषेध करावा, अस वाटलं नाही," अशी खंत त्यांनी व्यक्त केली. "खेड तालुक्यातील झालेल्या बंडखोरीची दखल घेतली गेली नाही," असे सांगत आढळरावांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

राष्ट्रवादीवर टीकास्त्र

खेड पंचायत समिती इमारतीच्या कामाचे श्रेय शिवसेनेला मिळू नये, यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या आमदाराने केलेला खटाटोप शिवसेनेच्या -हासाचे कारण असल्याचे गंभीर आरोप शिवाजी आढळराव पाटील यांनी केला. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कारभारावर टीकास्त्र सोडलं.

दिलीप मोहितेंवर निशाणा

राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीच्या ऐनवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर दिलीप मोहिते पाटलांनी नाराजी व्यक्त करत मतदान करणार नसल्याचे सांगितले. यावर आढळराव पाटील यांनी मोहिते पाटलांवर टीका केली. "तुझं मतदान राष्ट्रवादीला, मग नाराजी मुख्यमंत्र्यांवर कशासाठी,आपले नेते त्यांना फोन करुन मतदान करण्यासाठी विनंती करत होते आणि आता आमच्या विरोधात खेड पंचायत समितीचे काम सुरु झाले," अशी खंत आढळरावांनी व्यक्त केली.

Shivajirao Adhalrao Patil
सचिन आहिरांचा बंडखोरांना इशारा ; फ्लोअर टेस्ट आधी रोड टेस्ट द्यावी लागेल

आम्हाला आता जगू द्या

महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र असताना पुणे जिल्ह्यात मात्र शिवसेनेला संपविण्याचा डाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप आढळराव पाटील यांनी केला. "महाविकास आघाडीला विरोध नाही, मात्र आम्हाला आता जगू द्या," असं म्हणत आढळरावांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहे.

वार्डरचना राष्ट्रवादीच्या फायद्याची

पुढच्या काळात निवडणुकीला सामोरे जात असताना पुणे जिल्ह्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि नगरपरिषद वार्डरचना राष्ट्रवादी कॉग्रेसला कशी फायद्याची असेल, अशी करण्यात आली आहे. मग आमचा मुख्यमंत्री असताना शिवसेनेवर असाही अन्याय केला जात आहे," असा आरोप आढळराव पाटील यांनी भर सभेत केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com