Mumbai News : राज्यात महायुती सरकारला मिळालेल्या बहुमतासमोर महाविकास आघाडीचा विरोध टिकणार कसा, असा प्रश्न आहे. राज्यातील निर्णयांमध्ये नैसर्गिक न्याय व्हावा, यासाठी सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षनेता द्यावा, यासाठी नियमांचा आधार घेत महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने फिल्डिंग लावली आहे.
यासाठी दिल्लीतील केजरीवाल सरकारने भाजपला तीन आमदार असून विरोधी पक्षनेतेपद दिल्याचा दाखला दिला जात आहे. तसेच महाराष्ट्रतही होईल का? सत्ताधारी तसा निर्णय घेतली का? असे प्रश्न केले जात आहे.
राज्यात महायुतीविरोधात असलेल्या महाविकास आघाडीतील (MVA) पक्षांकडे विरोधी पक्षनेता पदासाठी पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळेल का? याची चर्चा सुरू झाली आहे. याबद्दल नियम काय, अशी विचारणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विधिमंडळ प्रशासनाकडे केली असून, योग्य तो निर्णय घेऊ, असे विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेता निवड कोणत्या नियमानुसार होते, त्यासाठीचा कायदा कोणता, अशी विचारणा करणारे पत्र शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयामार्फत विधिमंडळाच्या प्रधान सचिवांना दहा दिवसांपूर्वी देण्यात आले होते. या पत्रात विरोधी पक्षनेता निवडीच्या नियमांची माहिती आणि कायदेशीर बाबींची तरतूद लिखित स्वरूपात मिळावी, अशी मागणी केलेली आहे.
ही माहिती विधिमंडळाकडून अद्याप मिळाली नसल्याने रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी विधिमंडळ सचिवांची भेट घेऊन पुन्हा ही माहिती देण्यासंदर्भात सचिवांना विनंती केली आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी एका पक्षाचे किमान 10 टक्के आमदार निवडून यावे लागतात, अशी तरतूद नियमात नसल्याची आमची माहिती असल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केला.
10 टक्के सदस्य संख्येचे दाव्यानुसार 288 संख्याबळ असलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी एका पक्षाकडे किमान 29 आमदारांचे संख्याबळ आवश्यक आहे. मात्र, महाविकास आघाडीतील एकाही पक्षाकडे तेवढे संख्याबळ नाही. त्यामुळे यावेळी विधानसभेत विरोधी पक्षनेता नसेल, अशीही शक्यता आहे. विरोधी पक्षनेते निवडीसाठी 10 टक्के आमदार संख्येची तरतूद नाही, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी केला आहे.
दिल्लीच्या 70 सदस्यांच्या विधानसभेत आम आदमी पक्षाचे 67 आणि भाजपचे केवळ तीन आमदार निवडून आले होते. तरीही अरविंद केजरीवाल यांनी भाजपला विरोधी पक्षनेतेपद दिले होते. यातून त्यांनी लोकशाहीचा, संविधानाचा सन्मान केला होता. तसाच सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात करतील का? लोकशाहीसाठी तसा निर्णय घेतली का? अशी असून, याबाबत देवेंद्र नक्कीच सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.