
Maharashtra News : एकीकडे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी विरोधकांना एकत्र आणत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत 'वोट चोरी' चा मुद्दा चांगलाच तापवला आहे. त्यानंतर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार(Sharad Pawar) यांनीही विधानसभा निवडणुकीपूर्वी 2 माणसं मला भेटायला आली होती. ते दोन व्यक्ती मला विधानसभेला 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते,असं दावा करत खळबळ उडवून दिली असतानाच त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी आमदारानं झोप उडवणारं विधान केलं आहे.
आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्याकडून ईव्हीएम संदर्भात मोठा धक्कादायक दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन मॅनेज करण्याची ऑफर देण्यात आल्याचा खळबळजनक विधान सटाण्याचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी केला आहे.
चव्हाण म्हणाले, गुजरातच्या नारायणदास पटेल या व्यक्तीने ईव्हीएम हॅक करण्याची ऑफर दिली होती. पटेल हे गुजरातच्या भूज येथे आयटी तज्ज्ञ आहेत. 50 हजार ते दीड लाखांपर्यंत मताधिक्य वाढवून देण्याचा दावा पटेल यांनी केला होता.
ईव्हीएम (EVM) हॅक करण्याच्या कामासाठी नारायणदास पटेल यांनी त्यांच्याकडे तब्बल 5 ते 8 कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक दावाही माजी आमदार संजय चव्हाण यांनी केला आहे. या चव्हाण यांच्या आरोपांमुळे विरोधी पक्षाच्या राहुल गांधी आणि शरद पवारांच्या आरोपांना आणखी हवा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नारायणदास पटेल यांनी ईव्हीएम आणि पोलीस दोन्हीही गुजरातचे असल्यामुळे मशीन मॅनेज करणं शक्य आहे असं खळबळजनक विधान केलं आहे. तसेच ही बाब आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही कळवल्याचं माहिती दिली आहे. पण जयंत पाटील यांनी मात्र महाविकास आघाडीला चांगला जनाधार असल्याचं सांगितल्याचंही चव्हाण म्हणाले.
संजय चव्हाण यांनी यावेळी नारायणदास पटेस या कामासाठी एकदा सटाण्यातही येऊन गेल्याचा धक्कादायक दावाही केला. जर तुम्ही या कामाला नकार दिला, तर विरोधी उमेदवारांची भेट घेणार असल्याचा त्यांनी सांगितल्याचं चव्हाण यांनी नमूद केलं. याबाबतची एक तक्रारही आपण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती असंही माजी आमदार चव्हाण यांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांचा दावा काय..?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीबाबत मोठा दावा करताना राजकीय वातावरण तापवलं आहे. त्यांनी 'दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी मला काही लोक भेटायला आले. दोघे होते. त्यांची नावे, पत्ते आत्ता माझ्याकडे नाहीत. त्यांनी आम्हाला सांगितले की, महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. आम्ही तुम्हाला 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो.'
'मला आश्चर्य वाटलं. जे त्यांनी गॅरंटीचं सांगितलं. निवडणूक आयोग संस्थेबद्दल मला यत्किंचितही शंका नव्हती. राहुल गांधींची आणि त्या लोकांची मी भेट मी घालून दिली. त्या लोकांनी त्यांचं म्हणणं राहुल गांधींच्या समोर म्हटलं. राहुल गांधी आणि माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नये असं झालं. आपण लोकांमध्ये जाऊ, ते जो निर्णय देतील तो मान्य करू असंही ठरल्याचं पवार यांनी सांगितलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.