मुंबई : टीईटी घोटाळ्यात (TET Scam) माजी मंत्री आणि सध्या शिंदे गटातील ज्येष्ठ नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या एका मुलाचं आणि तीन मुलीचं नाव समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. अपात्र ठरवलेले असतांना सत्तार यांच्या मुली त्यांच्या सिल्लोड येथील शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून काम करत होत्या आणि पगार उचलत होत्या, अशी माहिती समोर आली आहे. (TET Exam Scam news Update)
या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) नेत्या विद्या चव्हाण यांनी टीकास्त्र डागलं आहे. अब्दुल सत्तार महाविकास आघाडीत मंत्री होते. माझ्या मुलींच्या या घोटाळ्यात हात नाही, असं त्यांनी सांगितलं होते. मात्र शिक्षण परिषदेने जवळपास सात हजार उमेदवारांची यादी समोर आणली होती. ज्यात त्यांच्या मुली अपात्र होत्या. सत्तारांनी विद्यार्थी पात्र असल्याचं आधी सांगितलंं. आता ते म्हणले की मी असं बोललोच नव्हतो. हा खोटारडेपणाचा कळस झाला आहे, असा संताप विद्या चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
शिंदे गटात गेलेली ही लोकं गद्दार आहेत. उद्या शपथ विधी होत असेल तर अब्दुल सत्तार यांनाच शिक्षण मंत्री करा. अशा लोकांमुळेच विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय. आता आम्ही असाच अन्याय सहन करायचा का, असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. महाविकास आघाडीने सुपे सारख्या लोकांना अटक केली होती आणि विद्यार्थ्यांना आशेचा किरण मिळाला होता. पण मंत्र्याची मुलं घोटाळे करत असतील तर करायचे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच सत्तारांना मंत्रिमंडळात स्थान द्या म्हणजे उरली सुरली इज्जत तुमची निघून जाईल, असा हल्लाबोल चव्हाण यांनी केला आहे.
गद्दार लोकांकडून आपण काय अपेक्षा करायची. ज्यांच्यावर ED लागली आहे ते सगळे तिथे पवित्र झाले आहेत. त्यामुळे भाजपबद्दल काय बोलणार दुसऱ्याचे आमदारांना घेऊन त्यांनी मंत्री मंडळ करावं, असा टोलाही विद्या चव्हाण यांनी लगावला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.