Devendra Fadanvis- Uddhav Thackeray: तर २०१९ ला ठाकरेंनी धोका दिलाच नसता..; फडणवीसांचा मोठा खुलासा

Maharashtra Politics : शिवसेनेतील बंडखोरीला एक वर्ष पूर्ण होऊन अवघे दोन दिवसच लोटले होते, तोच राज्यात दुसरा राजकीय भूकंप झाला.
Devendra Fadanvis- Uddhav Thackeray:
Devendra Fadanvis- Uddhav Thackeray: Sarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadanvis on Uddhav Thackeray : 'उद्धव ठाकरेंनीच 2019 ला आम्हाला धोका दिला,' असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शिवसेनेतील बंडखोरीला एक वर्ष पूर्ण होऊन अवघे दोन दिवसच लोटले होते, तोच राज्यात दुसरा राजकीय भूकंप झाला. अजित पवार यांनी आपल्या काही समर्थक आमदारांसह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

राज्यातील या दोन ऐतिहासिक घडामोडींमागे उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा मोठा हात असल्याचे सांगितले जाते. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी २०१९ मध्ये झालेल्या सत्तासंघर्षाच्या घडामोडींवर भाष्य केलं आहे.

उद्धव ठाकरेंनीच 2019 ला आम्हाला धोका दिला. निवडणुका झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं की, भाजपसोडून दुसऱ्या पक्षांसोबत गेलं तर त्यांचं सरकार बनू शकतं. आमच्या १० जागा जास्त आल्या असत्या तर त्यांनी असं केलचं नसतं. १० दिवस झाले तरी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आमच्यासोबत काहीच चर्चा केली नाही. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चर्चा सुरु झाल्या पण राष्ट्रवादीतील काही लोकांनी आमच्याशी संपर्क साधला. तीन पक्षांच्या या चर्चा सुरु आहे त्याने राज्य व्यवस्थित चालणार नाही.त्यापेक्षा आपण आणि भाजप एकत्र आल्यास राज्याला एक स्थिर सरकार देऊ शकू,असा प्रस्ताव आला. म्हणजेच भाजप आणि राष्ट्रवादी.

Devendra Fadanvis- Uddhav Thackeray:
NCP And Congress : महाविकास आघाडीत काँग्रेस आक्रमक; विरोधी पक्षनेते पदावर करणार दावा ?

मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा केली. शिवसेना आमच्यासोबत येणार नाही, हे आमच्या लक्षात आलं होतं. त्यानंतर माझी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली. महाराष्ट्राला एक स्थिर सरकार देऊ.भाजप आणि राष्ट्रवादी (BJP-NCP Politics) एक येईल. शरद पवार यांनी ही जबाबदारी माझ्यावर आणि अजित पवार यांच्यावर दिली. आमच्यात मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप, पालकमंत्रीपद या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली.

दुसऱ्याच सकाळी पवार साहेब मागे हटले. त्यांनी शिवसेनेकडे जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार म्हणाले, इतकं पुढे गेल्यानंतर मी मागे जाऊ शकत नाही. आपण भाजप सोबत जायला पाहिजे. त्यानुसार मी आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. पण दुर्दैवाने त्यावेळी न्यायालयाचा जो निर्णय आला. त्या निर्णयानुसार अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाली असती. त्यामुळे अजित पवार परत निघून गेले.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com