ठाकरेंसारखा मुख्यमंत्री कधी झाला नाही..आणि यापुढेही होऊ नये; राणेंचा टोला

Narayan Rane : त्यांनी आता गप्प बसावं बढाया मारू नये...
Uddhav Thackeray, narayan rane Latest News
Uddhav Thackeray, narayan rane Latest Newssarkarnama

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) कामाच विश्लेषण कराव असं काहीच काम त्यांनी केलं नाही. राज्यात गेल्या अडीच वर्षात उत्पन्न वाढलं नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. मराठी माणसांना नोकऱ्या मिळाल्या नाही. ठाकरे यांच्या सरकार निष्क्रिय होता. मी महाराष्ट्राच्या इतिहासात असं सरकार कधीच बघितलं नव्हतं आणि ठाकरेंसारखा मुख्यमंत्री कधी झाला नाही आणि भविष्यात होऊ देखील नये, असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. त्यांनी आज (ता.३१ ऑगस्ट) गणरायाच्या आगमनानिमित्त 'सरकारनामा'शी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी आणि ठाकरेंवर टीका केली आहे. (Uddhav Thackeray, narayan rane Latest News)

Uddhav Thackeray, narayan rane Latest News
मी आणि मुख्यमंत्री शिंदे निष्ठावान शिवसैनिक, त्यांनी दसरा मेळावा घ्यावा...

आज गणरायाचे आमच्या घरी आगमन झाल आहे. त्यांनी आम्हाला भरभरून दिल आहे. यावर्षी गणेश चतुर्थीच्या आधीच राज्यात सत्तांतर झाले आहे. गेल्या अडीच वर्षापासून राज्यवर असलेलं संकट टळलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील आमचं सरकार आलं आहे. गणरायाकडे काही मागाव असं काही उरलं नाही, त्यांनी आम्हाला खुप काही दिल आहे, अशी प्रतिक्रिया राणे यांनी यावेळी दिली आहे.

राणे यांनी महाविकास आघाडीच्या गेल्या अडीच वर्षाच्या कामगिरीवर बोलतांना जोरदाक टीका केली. ते म्हणाले की, गेल्या दीड वर्षात राज्यात कायदा सुव्यवस्था नव्हता याबरोबर कुठलाही विकास झाला नसून कोणत्याही क्षेत्रात ते काम करू शकले नाही. याचबरोबर राज्यात सुशांत सिंग सारख्या कलावंताची हत्या झाली. दिशा सालीयनची अत्याचार करून हत्या झाली त्यांच्यावर अन्याय झाला आहे. यामुळे आम्ही वारंवार हा प्रश्न उपस्थित करत आहे. त्यांच्या हत्येपाठीमागे तत्कालीन सरकारमधील काही लोकांचा हात असल्याचा आरोपही राणेंनी केला.

Uddhav Thackeray, narayan rane Latest News
Gulabrao Patil : शिंदेंसोबत जाताना सर्व देव आठवले, राजकारणात भांडणावेळी भांडण करायचे !

उद्धव ठाकरेंच्या कामाचा विश्लेषण कराव असं काहीच नाही राज्याचे गेल्या अडीच वर्षात उत्पन्न किंवा जी.डी.पी वाढला नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. मराठी माणसांना नोकऱ्या मिळाल्या नाही. ठाकरे यांच्या सरकार हे निष्क्रिय होत. मी महाराष्ट्राच्या इतिहासात असं सरकार कधीच बघितलं नव्हतं,असा टोला देखील त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. तर मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कामाचं विश्लेषण कराव असं काहीच काम त्यांनी केलं नाही. उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला कधी मिळाला नाही आणि परत कधी मिळूही नये. ते तीन तासापेक्षा जास्त वेळ ते मंत्रालयात ना कॅबिनेट न सभागृहात दिसत नव्हते. असला मुख्यमंत्री काय कामाचा त्यांनी आता गप्प बसावं बढाया मारू नये, अशा शब्दात राणे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

Uddhav Thackeray, narayan rane Latest News
भाजप-मनसे युतीबाबत अहिरांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

दरम्यान, शिवसेना घडवायला बाळासाहेबांना 48 वर्षे लागले आणि या माणसाने अडीच वर्षात ती संपून टाकली, रसातळाला नेली. एकनाथ शिंदे माझ्यापेक्षा ज्युनिअर आहेत. मात्र तेही निष्ठावंत मीही निष्ठावंत शिवसैनिक असल्याने आमच बोलणं व्हायच. मात्र ते स्वतःच्या कर्तुत्वावर मुख्यमंत्री झाले आहेत. दसरा मेळाव्याबाबत बोलतांना राणे म्हणाले की,शिवसेनेच्या जन्मापासून आतापर्यंत दसरा मेळावा झालेला असून मी देखील त्या मेळाव्याला उपस्थित होतो. भाषण केलेलं आहे. मात्र तेव्हा बाळासाहेबांच्य़ा विचाराचं सोनं लुटण्यासाठी हजारो शिवसैनिक त्या ठिकाणी यायचे. मात्र आता तसं काही विचारात राहिल नाही. यामुळे उद्धव ठाकरेंचे विचार कुणाला घ्यायचे नाहीत. त्यांनी उध्वस्त महाराष्ट्र करण्याचं काम केलं आहे, अशी जळजळीत टीकाही राणेंनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com