Shiv sena : 'ठाकरी तोफ' पुन्हा धडाडणार ? ; उद्धव ठाकरेंचे राठोडांच्या बालेकिल्ल्यात शक्तीप्रदर्शन

uddhav thackeray: पोहरादेवी येथे उद्धव ठाकरे हे लवकरच भेट देऊन विदर्भात शिवसेना प्रचाराची सुरुवात करणार आहेत.
Shiv sena : 'ठाकरी तोफ' पुन्हा धडाडणार ? ; उद्धव ठाकरेंचे राठोडांच्या बालेकिल्ल्यात शक्तीप्रदर्शन
Published on
Updated on

पुणे : शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना अधिक सक्रिय झाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) , युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे शिवसैनिक, विभागप्रमुख, जिल्ह्याप्रमुख यांच्याशी संवाद साधत आहेत. अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केल्यानंतर ठाकरे पिता-पुत्रांनी पुन्हा एकदा घराबाहेर पडून शिवसैनिकांना बळ देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केल्यानंतर राज्यात सत्तात्तर झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुंबईबाहेर पडलेले नाही. काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे हे फक्त शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मातोश्री बाहेर पडले होते.

आता ते लवकरच राज्याच्या दौरावर जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यांची सुरवात ते मराठवाड्यातून करणार आहेत. उद्धव ठाकरे हे लवकरच पोहरादेवी येथे भेट देऊन विदर्भात शिवसेना प्रचाराची सुरुवात करणार आहेत.

Shiv sena : 'ठाकरी तोफ' पुन्हा धडाडणार ? ; उद्धव ठाकरेंचे राठोडांच्या बालेकिल्ल्यात शक्तीप्रदर्शन
अजितदादाचं सूचक विधान ; मुख्यमंत्र्यांना म्हणाले, आपल्याला पुन्हा एकत्र यावं लागेल..

शिवसेना सोडून शिंदे गटासोबत गेलेले व मंत्री झालेले संजय राठोड त्यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांना शह देण्याची रणनीती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आखली आहे. लवकरच ते पोहरादेवी येथे जाणार आहे. बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी (ता. मानोरा, जि. वाशीम) येथे उद्धव ठाकरे भेट देणार आहेत. या भेटीवरून बंजारा समाजात दोन गट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बंजारा समाजाला शिवसेनेच्या पाठीशी उभे करण्याचा प्रयत्न ठाकरे करणार असल्याने या दौऱ्याला विशेष महत्व आहे. मुंबईतील बांधकाम व्यावसायिक, मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील राजू नाईक यांनी या दौऱ्यासाठी पुढाकार घेतला आहे. राजू नाईक यांनी धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे करून देत पोहरादेवी भेटीचे निमंत्रण दिले आहे.

राठोडांना इतकं महत्व का?

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक यांच्यानंतर जे काही नेते बंजारा समाजाला आपले वाटतात त्यापैकी संजय राठोड एक आहेत. संजय राठोड हे दिग्रस मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून येत आहेत. भावना गवळी यांच्या निवडून येण्यात बंजारा समाजाचं मतदान निर्णायक ठरत आलं आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभेत बंजारा समाजाचं किमान पाच लाख मतदान आहे. तिथे गेली पाच टर्म शिवसेनेला संजय राठोड यांचा फायदा होतोय. यावरुन राठोड किती आणि का महत्वाचे ते लक्षात येईल.

शिंदे गटासाठीही ते महत्वाचे

संजय राठोड यांनी गेल्या मंगळवारी शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. मविआमध्ये असताना पुण्यातील एका तरुणीच्या मृत्यूप्रकरणात सहभागी असल्याचे आरोप भाजपतर्फे करण्यात आल्याने राठोड यांना मंत्रीपद गमवावे लागले होते. त्यांनी आता पुन्हा एकदा मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राठोड यांच्यामागे असलेला बंजारा समाज यामुळे एकनाथ शिंदे गटासाठीही ते महत्वाचे ठरले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com