Varsha Gaikwad Resigned : काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी दिला आमदारकीचा राजीनामा!

Varsha Gaikwad and Rahul Narwekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द
Varsha Gaikwad Resigned
Varsha Gaikwad ResignedSarkarnama
Published on
Updated on

Varsha Gaikwad Latest news : मुंबईतील धारावी मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या आमदार व माजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज (मंगळवार,१८ जून) आपल्या आमदारपदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वर्षा गायकवाड या 29 उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून विजयी होऊन खासदार झाल्या आहेत, म्हणून त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली होती. भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी सुरुवातीला 53 हजारांचे लिड घेतले होते. मात्र त्यानंतर जोरदार मुसंडी मारत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी निकमांवर सरशी केली. अखेर गायकवाड यांनी अटीतटीच्या लढतीत निकमांचा पराभव करत विजय खेचून आणला होता.

Varsha Gaikwad Resigned
Varsha Gaikwad Win : 3 तास झुंजल्या पण वर्षा गायकवाडांनी पंजा मारलाच!

भाजपने अनेक दिग्गज्जांना घरी बसवून नवख्या उमेदवारांना तिकीट दिले. यातून भाजपअंतर्गत नाराजी असल्याचे आता स्पष्ट होत आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिलेल्या पूनम महाजन यांचे तिकिट कापून भाजपने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना रिंगणात उतरवले. तर काँग्रेसने धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांना तिकिट देत या निवडणुकीत रंगत आणली.

विशेष म्हणजे भाजपने या मतदारसंघातील सलग दोन टर्मच्या विद्यमान खासदार पूनम महाजन(Poonam Mahajan) यांना डावलून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे विरोधकांनी प्रमोद महजनांच्या वारशाला भाजपने डावलल्याचा टोलाही लगावला होता.

Varsha Gaikwad Resigned
Varsha Gaikwad Vs Ujjwal Nikam : घायाळ झालेल्या वर्षा गायकवाडांनी पंजा मारलाच !

लोकसभेची उमेदवारी जाहीर होण्याच्या काही दिवसांपूर्वी वर्षा गायकवाड यांच्या नाराजीबाबात चर्चा सुरू होत्या. मुंबई शहरातील लोकसभेच्या सहापैकी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या कमी जागांमुळे गायकवाड नाराज असल्याचं तेव्हा बोललं जात होतं.

मात्र त्यानंतर आपण नाराज नाही आणि आपण नॉट रिचेबलही नव्हतो, असं स्पष्टीकरण गायकवाड यांनी दिले होतं. तर मुंबईमध्ये आमच्या काँग्रेस पक्षाची अनेक ठिकाणी संघटनात्मक ताकद चांगली आहे. हा मुद्दा लक्षात घेऊन जागावाटप होणं गरजेचं होतं, असं वर्षा गायकवाडांनी तेव्हा म्हंटलं होतं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com