राज्यपालांची उचलबांगडी करा, अन्यथा त्यांचे धोतर फेडणार!

''आपलं वय आणि वक्तव्य बघता तुम्हाला निवृत्तीची गरज आहे, असे आम्हाला वाटते,'' असे विनोद पाटील म्हणाले.
Narendra Modi, Bhagat Singh Koshyari
Narendra Modi, Bhagat Singh Koshyarisarkarnama

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्याविषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari)यांनी केलेल्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांच्या विधानावर त्यांच्यावर टीका होत आहे. पुण्यात राष्ट्रवादी कॉग्रेसने महापालिकेच्या प्रवेशव्दाराजवळ आंदोलन सुरु केले आहे. त्यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. मराठा समाजाचे नेते विनोद पाटील (Vinod Patil)यांनीही राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

''राज्यपालांनी नविन जावईशोध लावला. पदावर आहात, ज्येष्ठ आहात म्हणून मुलाहिजा करतो. छत्रपती शिवरायांबद्दल भावना, संवेदना नसतील, तर त्याविषयी बोलताना नको त्या विषयात नाक खुपसू नये. आपले छत्रपतींविषयीचे खरे विचार काल आपसूक बाहेर आले. आपलं वय आणि वक्तव्य बघता तुम्हाला निवृत्तीची गरज आहे, असे आम्हाला वाटते,'' असे विनोद पाटील म्हणाले.

''पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi)मी आवाहन करतो की तात्काळ या बदफैली राज्यपालांची उचलबांगडी करावी व छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी. अन्यथा आम्ही सर्व शिवभक्त आपले धोतर फेडण्यास मागेपुढे पाहणार नाही,'' असा इशारा विनोद पाटील यांनी दिला आहे.

चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल ? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल?, असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी रविवारी केले. मराठी दिनाच्या निमित्तानं औरंगाबाद येथे आयोजित श्रीसमर्थ साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोश्यारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

Narendra Modi, Bhagat Singh Koshyari
Maratha Reservation :संभाजीराजे यांना सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण

''चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजीला किंवा चंद्रगुप्ताला छोटं म्हणत नाही. पण गुरूचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं. छत्रपतींनी समर्थांना म्हटलं की, राज्य मला तुमच्या कृपेने मिळालंय. आपल्याकडे गुरूला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले की, ‘या राज्याची चावी मी तुम्हाला देतो’ त्यावर समर्थ म्हणाले की, ‘ही राज्याची चावी मला कुठे देता. तुम्हीच याचे ट्रस्टी आहात”,असे विधान राज्यपालांनी केले. यामुळे वाद निर्माण झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com