Narendra Modi : मोदी जगाचे नेते झाले, पण देशाचे पंतप्रधान कधी होणार ?

Narendra Modi : ऐन निवडणुकीत मोदी यांना आपल्या जातीची आठवण का व्हावी?, असा सवाल अग्रलेखात करण्यात आला आहे.
Narendra Modi . uddhav  thackeray
Narendra Modi . uddhav thackeraysarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या 'सामना' मधून गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी हे जगाचे नेते झाले, पण देशाचे पंतप्रधान कधी होणार? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने (uddhav balasaheb thackeray) केला आहे.

भाजपाने मोदी यांना निवडणुका जिंकून देणारा यंत्रमानव बनवले आहे. पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर आहेत. तेथील विधानसभा निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून त्यांच्या दौऱ्याचे आयोजन व नियोजन भाजपने केले आहे. मोदी यांनी एका सभेत सांगितले की, ”माझी जात वगैरे न पाहता गुजरातच्या जनतेने मला समर्थन दिले.” ऐन निवडणुकीत मोदी यांना आपल्या जातीची आठवण का व्हावी?, असा सवाल अग्रलेखात करण्यात आला आहे.

"पंतप्रधानांच्या मनात स्वतःची जात असावी, हे बरे नाही. जात विसरायला हवी. जात नाही ती जात या सावटातून बाहेर पडले पाहिजे. मोदी यांना देशभरातून मतदान झाले. अनेक मोठय़ा राज्यांनी मोदी यांना भरघोस मतदान केले. तेथे जातीचा प्रश्न येतोच कोठे? त्यामुळे गुजरातच्या भूमीवर अशा प्रकारे जातपंचायत लावण्याची गरज नव्हती," अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोदींना सुनावले आहे.

Narendra Modi . uddhav  thackeray
Eknath Shinde : उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पुण्यातील प्रवाशांनी मानले मुख्यमत्र्यांचे आभार !

नेहरूंना कश्मीर प्रश्न सोडविता आला नाही हे मान्य, पण मोदी सरकारने त्याच प्रश्नावर मते मागितली. सत्ता मिळविली, मग गेल्या आठ वर्षांत नेहरूंची कश्मीरबाबतची चूक सुधारण्यासाठी तुम्ही काय केलेत? नेहरूंची चूक सुधारण्यासाठीच लोकांनी मोदी यांना पंतप्रधान केले. मोदी हे का विसरत आहेत? मोदी हे जगाचे नेते झाले, पण देशाचे पंतप्रधान कधी होणार? असे खडेबोल ठाकरे पक्षाने मोदी सरकारला सुनावले आहे.

'सामना'मध्ये म्हटलं आहे की..

  • मोदी हे जगातील एक महान नेते आहेत याविषयी कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही. मात्र त्यांना जगातील घडामोडींविषयी जितकी इत्यंभूत माहिती आहे, तेवढी आपल्या देशातील घडामोडींविषयी आहे काय, असा प्रश्न अनेकदा पडतो.

  • रशिया-युक्रेन युद्धावर आपले पंतप्रधान बोलतात. ही युद्धाची वेळ नाही असे त्यांनी पुतीन यांना मैत्रीच्या नात्याने बजावले. त्याचा चांगलाच आंतरराष्ट्रीय गवगवा झाला, पण कश्मीरात जे सुरू आहे त्याचे खापर नेहरूंवर फोडून पंतप्रधान मोदी मोकळे झाले.

  • नेहरूंना कश्मीर प्रश्न सोडविता आला नाही हे मान्य,पण मोदी सरकारने त्याच प्रश्नावर मते मागितली.सत्ता मिळविली, मग गेल्या आठ वर्षांत नेहरूंची कश्मीरबाबतची चूक सुधारण्यासाठी तुम्ही काय केलेत? ऊठसूट नेहरूनामाचे तुणतुणे का वाजवायचे?

  • कश्मीरात गेल्या पाच महिन्यांपासून कश्मिरी पंडितांचे टार्गेट किलिंग वाढले आहे. पंडित भयाच्या सावटाखाली वावरत आहेत. केंद्र सरकारने पंडितांना सुरक्षेची हमी दिली होती, पण पंडित मारले जात आहेत व पलायन करीत आहेत. यात नेहरूंचा काय दोष?

  • पुन्हा त्यांना आता गुजरात निवडणुकीच्या चक्रव्यूहात पक्षाने अडकविले, म्हणजे कश्मिरी पंडितांच्या किंकाळय़ा हवेतच विरणार. आता नेहरू काय करणार? असे सवालही या अग्रलेखातून करण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com