Devendra Fadnavis : '...तर स्थानिकच्या निवडणुकांना उशीर होईल', देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं कारणही सांगितलं...

Local Body Election : सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांमध्ये सूचना दिल्या आहेत.
Devendra Fadnavis Local Body Election
Devendra Fadnavis Local Body Electionsarkarnama
Published on
Updated on

Pune News : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आता मुहूर्त लागला आहे. सुप्रीम कोर्टाने पुढील चार महिन्यांमध्ये निवडणुका घ्याव्यात अशा सूचना दिल्या आहेत. त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही ठिकाणी या निवडणुकांना उशीर होण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रमध्ये नवीन सरकार आल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला होता की प्रशासकीय बदल झाले पाहिजेत. ई गव्हर्नर्संचा वापर करून प्रशासकीय कार्यक्षमता वाढली पाहिजे. त्यानुसार विविध टप्प्यावरील अधिकाऱ्यांच्या कार्यशाळा आम्ही घेत आहोत. जिल्हाधिकारी तसेच जिल्ह्याच्या सीईओ सोबत संवाद झाला. त्यानंतर आज महापालिकांच्या आयुक्त आणि मोठ्या नगरपालिकांचे सीईओ यांच्यासोबत कार्यशाळा आणि संवाद होणार आहे.

याचाच भाग म्हणून या अधिकाऱ्यांची वेगवेगळे गट करून या गटात सोबत चर्चा करून कोणत्या कोणत्या गोष्टी नव्याने करता येईल या बाबत आढावा घेण्यात येत आहे. ऑटोमेशन करून सगळ्या गोष्टी सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचा फडणवीस यांनी सांगितलं.

सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांमध्ये सूचना दिल्या आहेत. मात्र या निवडणुका घेण्यासाठी अनेक टेक्निकल गोष्टी बाधा बनू शकतात असं बोललं जात आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, निवडणूक वेळेत होण्यासाठी कोणतीही अडचण मला दिसत नाही.

निवडणूक आयोगाने देखील तयारी सुरू केली असून आम्ही वेळेत निवडणुका घेण्याचा प्रयत्न करू मात्र फारच जर मान्सून ज्या भागात जास्त असेल त्या भागामध्ये निवडणूक आयोगासोबत चर्चा करून त्या ठिकाणी निवडणूक घेण्यासाठी एक्सटेंशन मागून घेऊ असं फडणवीस म्हणाले. निवडणुका लांबणीवर जाऊ शकतात. पण वेळेत या निवडणुका पूर्ण झाल्याच पाहिजे, असा आमचा मानस असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

तुर्कीच्या मालावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय पुण्यातील व्यापाऱ्यांनी घेतला आहे. त्याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी त्यांच्या निर्णयाचे स्वागत करतो. नेशन फर्स्ट ही भूमिका घेतलीच पाहिजे. ज्या पद्धतीने पहेलगांमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांची हत्या केली. त्यानंतर ज्या आतंकवाद्यांना पोसणाऱ्या राष्ट्राला जर कोणी मदत करत असेल तर त्यांना धडा शिकवलाच पाहिजे.

पेहेलगाम येथे झालेला हल्ला हा मानवतेवती हल्ला होता आणि या मानवतेवर हल्ला करणाऱ्यांना मदत करणाऱ्या लोकांचा विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांचा मी अभिनंदन करतो. मात्र जर त्यांना धमक्या येत असतील, तर त्यांनी घाबरायचं कारण नाही. कारण हा पाकिस्तानात घुसून मारणारा भारत आहे.

अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्सने सॅटॅलाइट इमेजद्वारे पाकिस्तानचं सत्य बाहेर काढलं आहे. भारताला ते नख देखील लावू शकलेले नाहीत. मात्र त्यांना आपण उध्वस्त केलं आहे. त्यांच्या कोणाच्याही पोकळ धमक्यांना भिक घालण्याची आवश्यकता नाही. सगळ्यांना आम्ही प्रोटेक्शन देऊ मात्र नेशन फर्स्ट या भूमिकेवर सगळ्यांनी अटळ राहण्याची आवश्यकता असल्याचं फडणवीस म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com