India Post Recruitment 2025 : पदवीधरांसाठी जबरदस्त बातमी! इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत 348 पदांची भरती जाहीर, संधी दवडू नका लगेच करा अर्ज !

India Post Payments Bank Job Vacancy 2025 : नोकरीच्या शोधात आहात मग तुमच्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. 348 पदांची भरती जाहीर झाली आहे, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख.
India Post Recruitment 2025
India Post Recruitment 2025Sarkarnama
Published on
Updated on

बातमीत थोडक्यात काय?

  1. सरकारी विभागात 348 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

  2. या भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.

  3. इच्छुकांनी अर्जाची अंतिम तारीख येण्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करावा.

नोकरीच्या शोधात आहात मग तुमच्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) तर्फे ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या भरतीसाठी 29 ऑक्टोबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी IPPB ची अधिकृत वेबसाइट ippbonline.com ला भेट द्यावी.

एकूण पदसंख्या

या भरतीद्वारे एकूण 348 पदे भरली जाणार आहेत.

पात्रता निकष

या पदासाठी उमेदवारांकडे भारत सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठ, संस्था किंवा बोर्डामधून कोणत्याही शाखेतील स्नातक पदवी (Graduation) असणे आवश्यक आहे. ही पदवी नियमित किंवा दूरस्थ शिक्षण (Distance Education) पद्धतीने घेतलेली असू शकते.

India Post Recruitment 2025
Ajit Pawar : 'मंत्रालयात बसून प्रश्न कळत नाहीत, त्यासाठी...'; पुणे दौऱ्यावर असलेल्या अजितदादांचा नेत्यांना सल्ला, नेमकं काय म्हणाले?

वयमर्यादा

1 ऑगस्ट 2025 रोजी उमेदवाराचे वय 20 ते 35 वर्षांदरम्यान असणे बंधनकारक आहे.

निवड प्रक्रिया

या भरतीत कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांचा स्नातक स्तरावरील गुणांच्या टक्केवारीवरून निवड करण्यात येईल. त्यामुळे गुणपत्रिकेत चांगले गुण मिळवलेल्या उमेदवारांना संधी मिळू शकते.

अर्ज प्रक्रिया

  1. उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट ippbonline.com वर भेट द्यावी.

  2. होमपेजवरील संबंधित लिंकवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करावे.

  3. त्यानंतर अर्ज फॉर्म भरून सबमिट करावा.

  4. फॉर्म सबमिट झाल्यानंतर त्याचा प्रिंटआउट काढून ठेवावा.

India Post Recruitment 2025
Maharashtra Politics : उद्धव-राज ठाकरे निवडणूक आयोगाला पुन्हा भेटणार, शरद पवार मात्र गैरहजर राहणार! खरं कारण आलं समोर

अर्ज शुल्क

या भरतीसाठी उमेदवारांना 750 शुल्क भरावे लागेल. हे शुल्क एकदा भरल्यानंतर परत मिळणार नाही आणि अर्ज मागे घेता येणार नाही.

उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी अर्ज करण्यापूर्वी पात्रता निकष नीट तपासावेत आणि कोणत्याही माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवर बघावी. ग्रामीण भागातील युवकांसाठी ही सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ठरणार आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न :

प्र.1: या भरतीत किती पदे आहेत?
उ: एकूण 348 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

प्र.2: कोण अर्ज करू शकतो?
उ: कोणताही पदवीधर उमेदवार अर्जासाठी पात्र आहे.

प्र.3: अर्ज कसा करायचा?
उ: अर्ज अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन करावा लागेल.

प्र.4: अर्ज करण्याची शेवटची तारीख कधी आहे?
उ: अधिकृत अधिसूचनेनुसार दिलेल्या अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com