Ajit Pawar News: उपमुख्यमंत्री अजितदादांचे नुकसान भरपाईबाबत मोठे संकेत; म्हणाले,' उद्या होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत...'

Marathwada Rain Flood : अजित पवार सोमवारी (ता.29) पुणे दौऱ्यावर होते. या दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्यातील पूरपरिस्थितीवर भाष्य केलं. पूरग्रस्त भागाचा सर्व मंत्र्यांनी दौरे केलेत. या दौऱ्यादरम्यान, शेतकऱ्यांचा रोष, नाराजी, राग, विरोध पाहायला मिळाल्याचं पाहायला मिळाल्याचं अजितदादांनी म्हटलं.
Ajit Pawar marathwada flood .jpg
Ajit Pawar marathwada flood .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूरपरिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. हातात तोंडाशी आलेलं पीक आणि जनावर देखील वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून ओला दुष्काळ जाहीर अशी मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उद्या होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत मोठे निर्णय होणार असल्याचे सांगितले आहे.

अजित पवार सोमवारी (ता.29) पुणे दौऱ्यावर होते. या दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्यातील पूरपरिस्थितीवर भाष्य केलं. अजित पवार म्हणाले, पूरग्रस्त भागाचा सर्व मंत्र्यांनी दौरे केलेत. या दौऱ्यादरम्यान, शेतकऱ्यांचा रोष, नाराजी, राग, विरोध पाहायला मिळाला. जेव्हा घरदार उध्वस्त होतं, शेतीचं प्रचंड नुकसान होतं, जमीन वाहून जाते, तेव्हा साहजिक अशा प्रतिक्रिया उमटतात. पण आम्ही या शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल, त्या अनुषंगाने निर्णय घ्यायचं ठरवलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नी दिल्लीचा दौरा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना झालेल्या नुकसानीची माहिती दिली, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी, अशी मागणी केलेली आहे. यासाठी विविध विभागांची मदत लागणार आहे. सरकार याबाबत उद्याच्या बैठकीत निर्णय घेईल, असं अजित पवार म्हणाले.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करणार का? असं विचारलं असता अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री आणि सरकार म्हणून आम्ही सांगितलं आहे. शेतकऱ्यांना असं काही द्यावं लागणार आहे, जेणेकरून सरकार त्यांच्या पाठीशी आहे, असं वाटायला हवं. त्यानुसार दिवाळीपर्यंत बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्याचे नियोजन आहे. तसेच आत्ता तातडीची 5000 रुपये, अन्न-धान्य, कपडे, निवारा अशी मदत केली जात आहे. असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

Ajit Pawar marathwada flood .jpg
MP Shahu Maharaj : दिल्लीत भगवा फडकवणाऱ्या छत्रपती घराण्यातील शाहू महाराजांना 'खासदार' निवासच नाही, मोदी सरकारकडून अपमान?

लाडकी बहीण ई-केवायसी बाबत बोलताना अजित पवार म्हणाले, राज्यात बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो, तिथल्या महिलांनी ई-केवायसी केलेले आहेत. आता आपल्याला योग्य लाभार्थ्यांना ही रक्कम द्यायची आहे. बऱ्याच महिलांनी चुकीच्या पद्धतीने पैसे घेतलेत, सरकारचा पैसा आहे. तो चुकीच्या पद्धतीने कोणी घेऊ नये, म्हणून ई-केवायसी गरजेची आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com