वळसे पाटलांची पाचव्यांदा बाजी; बिनविरोधसाठी आढळरावांचेही सहकार्य

Dilip Walse Patil | NCP | Shivajirao Adhalrao Patil : शिवसेनेच्या सर्व उमेदवारांची शेवटच्या दिवशी माघार...
Dilip Walse Patil | Shivajirao Adhalrao Patil
Dilip Walse Patil | Shivajirao Adhalrao PatilSarkarnama

पारगाव : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या दत्तात्रयनगर (पारगाव, ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण २१ जागांसाठी १०२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चिन्ह वर्तवले जात होते. मात्र मंगळवारी अखेरच्या दिवशी एकूण ८० उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे कारखान्याचे संस्थापक, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) एकूण १८ उमेदवार बिनविरोध निवडून आले. परंतु शिंगवे – रांजणी गटात ३ जागांसाठी ४ उमेदवार रिंगणात असल्याने तिथे निवडणूक लागली असून रविवारी (दि. १७ जुलै) मतदान होणार आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी स्थापन केलेला भीमाशंकर सहकारी साखर कारखाना प्रत्येक गाळप हंगामात परिसरातील इतर कारखान्याच्या तुलनेने ऊसाला उच्चांकी बाजारभाव देत आल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा कारखाना कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरला आहे. वळसे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब बेंडे व संचालक मंडळ, कर्मचारी व अधिकारी यांच्या योग्य नियोजनामुळे कारखान्यास आत्तापर्यंत देशपातळीवरील ११ व राज्यपातळीवरील ११ असे एकूण २२ पुरस्कार प्राप्त झाले आहे.

मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळास सुमारे २ वर्षाची मुदतवाढ मिळाली होती. त्यानंतर आता एकूण २१ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. विद्यमान संचालकांपैकी १९ संचालकांनी पुन्हा अर्ज दाखल केले होते. शिवसेनेनेही काही जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यामुळे शिवसेना नेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

अखेरीस अर्ज माघारीच्या दिवशी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांनी माघार घेतली. परंतु शिंगवे-रांजणी गटात तुकाराम बाबुराव गावडे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, बाबासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर हे तिन्ही विद्यमान संचालक रिंगणात असल्याने तीन जागांसाठी निवडणूक होत आहे. गावडेंच्या मनधरणीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करूनही अपयश आले.

बिनविरोध निवडून आलेले संचालक पुढील प्रमाणे : उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था – दिलीप वळसे पाटील, मंचर / म्हाळुंगे गट- बाळासाहेब बेंडे, अंकित जाधव, अरुण चासकर, घोडेगाव / शिनोली गट- अक्षय काळे, सीताराम लोहोट, बाजीराव बारवे, पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक / निरगुडसर गट- प्रदीप वळसे पाटील, रामचंद्र ढोबळे, अशोक घुले, अवसरी बुद्रुक/ पेठ गट- आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, शांताराम हिंगे, अनुसूचित जाती/ जमाती प्रतिनिधी – ज्ञानेश्वर आस्वारे, महिला राखीव प्रतिनिधी – पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी – नितीन वाव्हळ, भटक्या विमुक्त जाती व जमाती किंवा विशेष मागासप्रवर्ग – रामहरी पोंदे.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात झालेल्या चर्चेनुसार शेतकरी हिताच्या चांगल्या चाललेल्या साखर कारखान्याला सहकार्य करण्याच्या दृष्टीने शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या सर्व उमेदवारांनी माघार घेतली. अपक्ष उमेदवार तुकाराम गावडे यांनी फक्त सुरवातीला तुमच्या पॅनेल मध्ये घेता का अशी विचारणा केली होती त्यांचा व शिवसेनेचा कसलाही दुरापास्त सबंध नसल्याचे जाहीर केले. - अरुण गिरे (शिवसेना तालुका प्रमुख)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com