

kolhapur News: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज महाराष्ट्रातील रस्त्या संदर्भात भाष्य करत महत्वपूर्ण माहिती दिली. शरद पवार यांनी गोविंद बागेतून आमंत्रण दिल्याचे माहिती मंत्री मुश्रीफ यांनी स्वतः दिली. शिवाय राहुल गांधी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर टीका केल्याने त्यांच्यावर सडाडून टीका केली.
इथेनॉल धोरण माजी पंतप्रधान अटल बिहारीं वाजपेयी यांनी आणले. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान करून राहुल गांधी यांना काय मिळणार आहे? असा सवाल करत शरद पवार यांच्याकडून मला गोविंद बागेचे आमंत्रण आहे. ऊसाच्या नवीन तंत्रज्ञानाचा पाहणी करायला जाणार आहे.
त्यावेळी मी पवार साहेबाना विनंती करणार आहे. राहुल गांधी यांना इथेनॉलच्या मुद्द्यावर शहाणा करा, अशी समजूत घालण्याची विनंती करणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. राज्यातील खराब रस्त्यासंदर्भात बोलताना, नंदुरबार जिल्हाचा पालकमंत्री आहे, महिन्यातून एक दोन वेळा जात असतो.
सुरतवरून नंदुरबारला तीन तासाचा रस्ता आहे. दोन तास चांगला रस्ता व महाराष्ट्र मधील एक तासाचा रस्ता खराब आहे.गुजरात हद्दीतील रस्ते चांगले आहेत. म्हणून महाराष्ट्रातील खराब रस्त्यासंदर्भात मी बोललो. रस्त्याची अवस्था पाहून मला पालकमंत्री म्हणून मला लाज वाटली.
सत्तारुढ लोकांनी सुद्धा रस्त्यांची चांगली कामं केली पाहिजे.पावसाळ्यात रस्त्याबर खड्डे पडणार नाहीतर अशी तंत्रज्ञान आले पाहिजे. रस्त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांची त्रास होता ते संपवता आले पाहिजे.अनेक सरकार आले आणि गेले पण हा कायमचा रस्ता करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आले पाहिजे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाबाबत बोलताना, मुंबई अध्यक्षबाबत अजूनही कोणाचे नाव आमच्या पक्षात राहिलेले नाही.
मुंबईत गेल्यानंतर त्यांची माहिती घेईन, असे स्पष्ट केले. राज्य कर्जबाजारीवर बोलताना, आपण सखल उत्पन्न पेक्षा व मूलभूत विकासासाठी घेतलेले कर्ज हे 15 टक्केच आहे. आपण कोणताही नियम मोडून कर्ज घेतलेला नाही. घेतलेले कर्ज हे योग्य प्रमाणात असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
इथेनॉलच्या मुद्द्यावरून बोलताना, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांची भूमिका निभवावी.पण देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री यांना एकेरी भाषा बोलत आहेत. त्यांना हे शोभत नाही, त्यांनी पंतप्रधान व गृहमंत्री यांचा सन्मान ठेवला पाहिजे. ते विरोधी पक्षनेते असतील पण त्यांना अपमान व शिव्या देण्याचा अधिकार नाही. राहुल गांधी वयाने लहान आहेत, त्यामुळे वयाचा व पदाचा मान सन्मान ठेवला पाहिजे.
गोकुळ दूध संघाची निवडणूक आता 60 दिवसात घ्यावीच लागणार आहे. पुन्हा मुदतवाढ घेण्यासाठी न येण्याचा सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. त्यामुळे प्रशासक मंडळाचे काऊ डाऊन सुरू झाले आहे. महायुती म्हणून आम्ही सर्वजण एकत्रच लढणार आहोत. प्रशासक मंडळाने पशुखाद्य दरवाढीचा निर्णय जर परवडत नसेल तरच घ्यावा. मात्र कमिशनच्या बाबतीत काही गडबड आहे यामध्ये मला शंका असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.