Adhalrao Vs Kolhe: 'पोपट' म्हणणाऱ्या आढळरावांची कोल्हेंनी काढली पिसं; हा तर जनतेचा अवमान...

Shirur Loksabha Constituency 2024: शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी आधीच नंदीबैल आणि पोपट यांच्या उपमा देत आजी-माजी खासदारांमध्ये चांगलीच जुगलबंदी सुरू आहे.
Dr. Amol Kolhe, Shivajirao Adhalrao Patil
Dr. Amol Kolhe, Shivajirao Adhalrao PatilSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha 2024 News : लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Constituency 2024) जाहीर होण्यापूर्वीच शिरूरमध्ये आजी-माजी खासदारांमध्ये कुस्ती रंगली आहे. दररोज आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिरूरमध्ये नंदीबैल, पोपटावरून मतदारांची चांगलीच करमणूक होत आहे.

एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी विद्यमान खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) सोडत नसल्याचे सध्याचे चित्र आहे.

संसदेत नंदीबैल पाठवायचा की, वाघ अशी टीका आढळराव यांचे नाव न घेता अमोल कोल्हेंनी केली होती. त्याचा खरपूस समाचार आढळरावांनी घेतला. वाघ पाठवायची भाषा कोल्हेंनी करू नये, असा टोला त्यांनी लगावला. संसदेत पोपट (कोल्हे) नाही, तर विकासकामे करणारा माणूस पाठवायचा आहे, असा टोला त्यांनी हाणला. त्याला कोल्हेंनी प्रत्युत्तर दिले.

Dr. Amol Kolhe, Shivajirao Adhalrao Patil
Sanjay Raut on Vasant More: वसंत मोरेंनी 'वॉशिंग मशीन'च्या दिशेने जाऊ नये; राऊतांचा सल्ला

शिरूर लोकसभा मतदारसंघात (Shirur Loksabha Constituency 2024) उमेदवारी आधीच नंदीबैल आणि पोपट यांच्या उपमा देत आजी-माजी खासदारांमध्ये चांगलीच जुगलबंदी सुरू आहे."सर्वसामान्य जनतेचे प्रश्न पोटतिडकीने संसदेत मांडले, याला पोपटगिरी म्हणत असाल तर हा जनतेचा अवमान आहे. जनताच तुम्हाला उत्तर देईल," अशा शब्दांत कोल्हेंनी आढळरावांना पुन्हा सुनावले.

"शेतकऱ्यांची व्यथा, वेदना संसदेत पोटतिडकीने मांडण्याला तुम्ही पोपटगिरी म्हणत असाल तर हा जनतेचा अवमान आहे. आता याचं उत्तर जनताच तुम्हाला देईल," असे कोल्हे म्हणाले. राज्यात शेतकऱ्यांच्या शेतमालाचे बाजारभाव, दुधाचे पडलेले दर यावरून महायुतीचे खासदार संसदेत मूग गिळून गप्प बसले होते. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न असताना दिल्लीच्या तालावर मान डोलावणारा नंदीबैल पाठवायचा का? असे विधान कोल्हे यांनी केली.

काय म्हणाले होते आढळराव

  • अमोल कोल्हेंनी एका रुपयाचे काम केले नाही वा एक गावभेट केली नाही. फक्त चांगली भाषणे केली म्हणजे मतदारसंघातील प्रश्न सुटत नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. विकासकामे करणे हे नटाचे काम नाही, हे अजितदादा बोलले ते आहे.

  • वर्षातून एकदा केव्हातरी, ते गावाला म्हणजे नारायणगावला स्वताच्या घरी येतात. त्यामुळे असा राउंडवर येणारा की, माझ्यासारखा ग्राउंडवरील नेता तुम्हाला पाहिजे. गल्लीत फिरणारा म्हणून ते माझी खिल्ली उ़डवितात, ते खरं आहे. कारण राजकारण गल्लीतूनच सुरू होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com